Loksabha Election: मतदान केंद्रांवर नक्की चाललंय काय? मणिपूरमध्ये गोळीबार तर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.


थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराहट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.



पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर दगडफेक


पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील एका मतदान केंद्रावर दगडफेक झाली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Sankashti Chaturthi Feb 2026: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 5 फ्रेब्रुवारीला, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या

गुवाहाटीत घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक मानसिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल

गुवाहाटी : देशभरात मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. घरकाम, अत्याचार, बलात्कार, असमान वागणूक हे सगळं सहन

मुंबईमध्ये 'श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग'चे आयोजन

मुंबई : श्रीलंका टुरिजम प्रमोशन ब्युरोने मुंबईमध्ये श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंगचे आयोजन केले होते.

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

पुणे : ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला