Loksabha Election: मतदान केंद्रांवर नक्की चाललंय काय? मणिपूरमध्ये गोळीबार तर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक

  58

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.


थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराहट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.



पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावर दगडफेक


पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील एका मतदान केंद्रावर दगडफेक झाली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये