Lok Sabha Election 2024: २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू

  62

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आहे. काही जागांवर मतदान सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशमधील १०२ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ कोटींहून अधिक मतदाते आहेत.


लोकसभा निवडणूक यंदा सात टप्प्यात होत आहे. पुढे दुसरा टप्पा २६ एप्रिलला ८९, तिसऱ्या टप्प्यात ७ मेला ९४, चौथ्या टप्प्यात १३ मेमला ९६, पाचव्या टप्प्यात २० मेला ४९, सहाव्या टप्प्यात २५ मेला ५७ आणि सातव्या टप्प्यात एक जूनला ५७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.


२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा हा सगळ्यात मोठा टप्पा. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत INDIA गठबंधनची परीक्षा असणार आहे. गेल्या वेळेस या १०२ जागांपैकी UPAने ४५ तर एनडीएने ४१ जागांवर विजय मिळवला होता.


पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील सर्वाधिक ३९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १६ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यात मोदी सरकारचे ११ मंत्री मैदानात आहेत तर ७ माजी मुख्यमंत्र्यांच्या भविष्याचा फैसलाही आज मतपेटीत कैद होईल.


या टप्प्यात नितीन गडकरी, किरेन रिजीजू, भूपेंद्र यादवसारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. लोकसभेच्या १०२ जागांसोबतच अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. आज १० राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील मतदानाचे काम पूर्ण होईल.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )