Lok Sabha Election 2024: २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू

Share

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आहे. काही जागांवर मतदान सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशमधील १०२ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ कोटींहून अधिक मतदाते आहेत.

लोकसभा निवडणूक यंदा सात टप्प्यात होत आहे. पुढे दुसरा टप्पा २६ एप्रिलला ८९, तिसऱ्या टप्प्यात ७ मेला ९४, चौथ्या टप्प्यात १३ मेमला ९६, पाचव्या टप्प्यात २० मेला ४९, सहाव्या टप्प्यात २५ मेला ५७ आणि सातव्या टप्प्यात एक जूनला ५७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा हा सगळ्यात मोठा टप्पा. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत INDIA गठबंधनची परीक्षा असणार आहे. गेल्या वेळेस या १०२ जागांपैकी UPAने ४५ तर एनडीएने ४१ जागांवर विजय मिळवला होता.

पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील सर्वाधिक ३९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १६ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यात मोदी सरकारचे ११ मंत्री मैदानात आहेत तर ७ माजी मुख्यमंत्र्यांच्या भविष्याचा फैसलाही आज मतपेटीत कैद होईल.

या टप्प्यात नितीन गडकरी, किरेन रिजीजू, भूपेंद्र यादवसारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. लोकसभेच्या १०२ जागांसोबतच अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. आज १० राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील मतदानाचे काम पूर्ण होईल.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

11 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

39 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago