Lok Sabha Election 2024: २१ राज्यांतील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू

  55

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले आहे. काही जागांवर मतदान सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. हे मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशमधील १०२ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ कोटींहून अधिक मतदाते आहेत.


लोकसभा निवडणूक यंदा सात टप्प्यात होत आहे. पुढे दुसरा टप्पा २६ एप्रिलला ८९, तिसऱ्या टप्प्यात ७ मेला ९४, चौथ्या टप्प्यात १३ मेमला ९६, पाचव्या टप्प्यात २० मेला ४९, सहाव्या टप्प्यात २५ मेला ५७ आणि सातव्या टप्प्यात एक जूनला ५७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.


२०२४च्या लोकसभा निवडणुकीचा हा सगळ्यात मोठा टप्पा. पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत INDIA गठबंधनची परीक्षा असणार आहे. गेल्या वेळेस या १०२ जागांपैकी UPAने ४५ तर एनडीएने ४१ जागांवर विजय मिळवला होता.


पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील सर्वाधिक ३९ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात १६ कोटी ६३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पहिल्या टप्प्यात मोदी सरकारचे ११ मंत्री मैदानात आहेत तर ७ माजी मुख्यमंत्र्यांच्या भविष्याचा फैसलाही आज मतपेटीत कैद होईल.


या टप्प्यात नितीन गडकरी, किरेन रिजीजू, भूपेंद्र यादवसारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहेत. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. लोकसभेच्या १०२ जागांसोबतच अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. आज १० राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील मतदानाचे काम पूर्ण होईल.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या

Corona Updates: देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू!

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ (Corona Cases In India) लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प