जे दहशतवादाला प्रोत्साहन देत होते त्यांना साधे पीठ मिळणे मुश्किल झाले आहे, पंतप्रधान मोदींचा निशाणा

दमोह: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर आपल्या रॅलीतील भाषणादरम्यान जोरदार टीका केली आहे. जे देश दहशतवाद निर्यात करत होते ते साध्या पीठासाठी संघर्ष करत आहेत. पंतप्रधानांनी हे विधान मध्य प्रदेशच्या दमोह येथे निवडणुकीच्या रॅलीमध्ये जनतेला संबोधित करताना म्हटले.


पंतप्रधान टीका करताना म्हणाले, जगातील अनेक देश ज्यांची स्थिती खूपच खराब आहे. अनेक जण दिवाळखोरीची शिकार बनले आहेत. इतकं की आमच्या शेजारील देश जो दहशतवादाला प्रोत्साहन देत होता त्यांना आता पीठ मिळणे मुश्किल झाले आहे. तर दुसरीकडे भारत देश जो परदेशातून हत्यारे खरेदी करत होता आता दुसऱ्या देशांना उच्च तंत्रज्ञानाची हत्यारे निर्यात करत आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लोकांनी केंद्रात एक मजबूत आणि स्थिर सरकारसाठी मतदान केले पाहिजे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की त्यांचे सरकार राष्ट्र प्रथम या सिद्धांतावर काम करते आणि कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकासह पश्चिमेकडून दबाव असताना रशियाकडून तेल खरेदी भारताच्या पावलाबाबत बचावात्मक भूमिका घेतली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांना स्वस्त तेल मिळावे तसेच शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही गेल्या १० वर्षांत पाहिले की एक स्थिर सरकार लोकांच्या हितामध्ये कसे काम करते. कोरोनाच्या संकटादरम्यान जगभरात अराजकता होती मात्र एका मजबूत भाजप सरकारने जगभरातील आपल्या नागरिकांना माघारी आणले.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी