IPL 2024: फक्त १ सामना आणि तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न

  49

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने दमदार कामगिरी केली. या हंगामातील पहिले शतकही याच फलंदाजाने केले. कमालीची बाब म्हणजे धमाकेदार फलंदाजी केल्यानंतरही या खेळाडूचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावू शकते. केवळ १ सामन्यानंतर हे निश्चित होईल की रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरूचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.


२००८ पासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमियर लीग जिंकण्याचा दावेदार सांगितला जात आहे. कमालीची बाब म्हणजे संघात स्टार खेळाडूंनी भरलेला असतानाही संघाला एकदाही खिताब जिंकता आलेला नाही. मोठमोठ्या खेळाडूंची फौज असलेला संघ असतानाही त्यांना निराशा हाती आलेली आहे.


विराट कोहलीपासून अनेक मोठमोठे कर्णधार बंगळुरूला खिताब जिंकून देऊ शकलेले नाहीत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातही आयपीएलमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.



तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न


या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत यातील केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. गेल्या पाच सामन्यांत विराट कोहलीला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत सगळ्यात खालच्या स्थानावर असलेल्या आपल्या संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर पुढील सामना जिंकावाच लागेल. जर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतूीतून बाहेर जातील.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार