IPL 2024: फक्त १ सामना आणि तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने दमदार कामगिरी केली. या हंगामातील पहिले शतकही याच फलंदाजाने केले. कमालीची बाब म्हणजे धमाकेदार फलंदाजी केल्यानंतरही या खेळाडूचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावू शकते. केवळ १ सामन्यानंतर हे निश्चित होईल की रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरूचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.


२००८ पासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमियर लीग जिंकण्याचा दावेदार सांगितला जात आहे. कमालीची बाब म्हणजे संघात स्टार खेळाडूंनी भरलेला असतानाही संघाला एकदाही खिताब जिंकता आलेला नाही. मोठमोठ्या खेळाडूंची फौज असलेला संघ असतानाही त्यांना निराशा हाती आलेली आहे.


विराट कोहलीपासून अनेक मोठमोठे कर्णधार बंगळुरूला खिताब जिंकून देऊ शकलेले नाहीत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातही आयपीएलमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.



तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न


या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत यातील केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. गेल्या पाच सामन्यांत विराट कोहलीला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत सगळ्यात खालच्या स्थानावर असलेल्या आपल्या संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर पुढील सामना जिंकावाच लागेल. जर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतूीतून बाहेर जातील.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख