IPL 2024: फक्त १ सामना आणि तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने दमदार कामगिरी केली. या हंगामातील पहिले शतकही याच फलंदाजाने केले. कमालीची बाब म्हणजे धमाकेदार फलंदाजी केल्यानंतरही या खेळाडूचा संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढावू शकते. केवळ १ सामन्यानंतर हे निश्चित होईल की रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरूचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.


२००८ पासून ते आतापर्यंत प्रत्येक वेळेस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ इंडियन प्रीमियर लीग जिंकण्याचा दावेदार सांगितला जात आहे. कमालीची बाब म्हणजे संघात स्टार खेळाडूंनी भरलेला असतानाही संघाला एकदाही खिताब जिंकता आलेला नाही. मोठमोठ्या खेळाडूंची फौज असलेला संघ असतानाही त्यांना निराशा हाती आलेली आहे.


विराट कोहलीपासून अनेक मोठमोठे कर्णधार बंगळुरूला खिताब जिंकून देऊ शकलेले नाहीत. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातही आयपीएलमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.



तुटू शकते विराट कोहलीचे स्वप्न


या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत यातील केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. गेल्या पाच सामन्यांत विराट कोहलीला सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत सगळ्यात खालच्या स्थानावर असलेल्या आपल्या संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर पुढील सामना जिंकावाच लागेल. जर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हरला तर ते प्लेऑफच्या शर्यतूीतून बाहेर जातील.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि