Ajit Pawar: मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत

  118

अजित पवार यांचे मोठे वक्तव्य


धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशात तिसऱ्यांदा सरकार आले तर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धाराशिव येथील प्रचार सभेत म्हटले.


यावेळी बोलताना ते म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम करतात, मग ते मागील पुढील विचार करून करतात.


''राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३०० युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार आल्यावर वरील युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.''असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासासाठी आम्ही महायुती मधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचा देखील विकास करून घ्यायचा आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे, असेही ते म्हणाले.


याआधी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''मी यापूर्वी अनेकदा आलो. पण धाराशिवमध्ये माझ्या सासरवाडीत एवढी मोठी गर्दी पहिल्यांदा पाहिली. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाचे नेतृत्व केले. ३ कोटी घर देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

बुलढाण्यात वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा अपघात; ३० वारकरी जखमी

पंढरपूर देवदर्शन करून घरी परतत असताना वारकऱ्यांची बस पलटली  जळगाव: पंढरपूर येथे देवदर्शन करुन घराकडे परतत

विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मंत्री अतुल सावेंना सुनावलं

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या

प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने विकसित केले शैक्षणिक 'ॲप्स'

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव आणि अत्यंत उपयुक्त रोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील

NUCFDC CIBIL : UCBs क्षेत्र डिजिटल सुविधा देण्यासाठी सज्ज, सर्वसमावेशक विकासाचे ध्येय !

NUCFDC आणि ट्रान्सयुनियन सिबिलतर्फे सहकार ट्रेंड्सचा रिपोर्ट पाच वर्षांत पोर्टफोलिओ बॅलन्समध्ये १.८ पट वाढ, प्रमुख

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत राज्यात २३