Ajit Pawar: मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास ३०० युनिट वीज मिळणार मोफत

अजित पवार यांचे मोठे वक्तव्य


धाराशिव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशात तिसऱ्यांदा सरकार आले तर ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धाराशिव येथील प्रचार सभेत म्हटले.


यावेळी बोलताना ते म्हणाले, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना गरिबांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि पहिले बिल शून्याचे दिले. मात्र नंतर पुन्हा आधीसारखे बिल देण्यास सुरुवात झाली. असे करणे परवडत नाही. मात्र मोदी हे कोणतेही काम करतात, मग ते मागील पुढील विचार करून करतात.


''राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो. आता ३०० युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे तिसऱ्यांदा मोदींचे सरकार आल्यावर वरील युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.''असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. विकासासाठी आम्ही महायुती मधून लढतोय. विकासाकरिता आम्हाला राज्याचा देखील विकास करून घ्यायचा आहे. केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आम्हाला या कामासाठी लागणार आहे, असेही ते म्हणाले.


याआधी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ''मी यापूर्वी अनेकदा आलो. पण धाराशिवमध्ये माझ्या सासरवाडीत एवढी मोठी गर्दी पहिल्यांदा पाहिली. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदींनी या देशाचे नेतृत्व केले. ३ कोटी घर देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली