West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राम नवमीच्या दिवशी गोंधळ, शोभायात्रेदरम्यान दगडफेक

कोलकाता: पश्चिम बंगालच्या(west bengal) मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या(ram navmi) उत्साहादरम्यान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या रेजीनगर स्थित शक्तिपूर भागात बुधवारी संध्याकाळी राम नवमीनिमित्त शोभायात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. यात काही लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असाही दावा केला जात आहे की जेव्हा राम नवमीची शोभायात्रा काढली जात होती तेव्हा या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोकांना छतावरून दगड फेकताना पाहिले गेले. दरम्यान, पोलिसांना हे रोखण्यासाठी लाठी चार्जही करावा लागला. भाजपचा आरोप आहे की रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले.


मुशिर्दाबाग जिल्ह्यातील शक्तिपूरमध्ये बुधवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान स्फोटही झाला. यात एक महिलाही जखमी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार या जखमी महिलेला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बुधवारी संध्याकाळी झाला. यात एक महिला जखमी झाली. या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले नाही की हा स्फोट बॉम्बमुळे झाला की इतर कारणांनी.


 


अशीही माहिती आहे की ही घटना बुधवारी संध्याकाळी शक्तिपूर भागात झाली. या ठिकाणी एक समूह राम नवमीनिमित्त जल्लोष करत होता. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात या भागात लोक आपल्या छतावरून शोभायात्रेवर दगडफेक करताना दिसत आहे. यावेळी गोंधळ झाल्याने तो आवरम्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.


दरम्यान, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत आरोप केला की मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना राम नवमीच्या उत्सवादरम्यान निशाणा बनवण्यात आले. अमित मालवीय म्हणाले, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालसाठी कलंक आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रामनवमीच्या शोभायात्रेच्या सुरक्षेत विघ्न आणले. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले. या भागात हिंदू अल्पसंख्यांक आहेत.

Comments
Add Comment

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा

बिहारच्या रस्ते विकासासाठी २०२६ ठरणार महत्त्वाचे! केंद्र सरकाने दिला महामार्गाला हिरवा कंदील

बिहार: बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०२६ हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या