West Bengal: पश्चिम बंगालमध्ये राम नवमीच्या दिवशी गोंधळ, शोभायात्रेदरम्यान दगडफेक

  102

कोलकाता: पश्चिम बंगालच्या(west bengal) मुर्शिदाबादमध्ये रामनवमीच्या(ram navmi) उत्साहादरम्यान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या रेजीनगर स्थित शक्तिपूर भागात बुधवारी संध्याकाळी राम नवमीनिमित्त शोभायात्रेदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. यात काही लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असाही दावा केला जात आहे की जेव्हा राम नवमीची शोभायात्रा काढली जात होती तेव्हा या भागात दगडफेक सुरू झाली आणि लोकांना छतावरून दगड फेकताना पाहिले गेले. दरम्यान, पोलिसांना हे रोखण्यासाठी लाठी चार्जही करावा लागला. भाजपचा आरोप आहे की रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले.


मुशिर्दाबाग जिल्ह्यातील शक्तिपूरमध्ये बुधवारी संध्याकाळी रामनवमीनिमित्त शोभा यात्रेदरम्यान स्फोटही झाला. यात एक महिलाही जखमी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार या जखमी महिलेला मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज व रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट बुधवारी संध्याकाळी झाला. यात एक महिला जखमी झाली. या घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले नाही की हा स्फोट बॉम्बमुळे झाला की इतर कारणांनी.


 


अशीही माहिती आहे की ही घटना बुधवारी संध्याकाळी शक्तिपूर भागात झाली. या ठिकाणी एक समूह राम नवमीनिमित्त जल्लोष करत होता. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात या भागात लोक आपल्या छतावरून शोभायात्रेवर दगडफेक करताना दिसत आहे. यावेळी गोंधळ झाल्याने तो आवरम्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.


दरम्यान, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्वीट करत आरोप केला की मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना राम नवमीच्या उत्सवादरम्यान निशाणा बनवण्यात आले. अमित मालवीय म्हणाले, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालसाठी कलंक आहेत. त्यांनी पुन्हा एकदा रामनवमीच्या शोभायात्रेच्या सुरक्षेत विघ्न आणले. मुर्शिदाबादच्या रेजीनगरमध्ये हिंदू भक्तांना निशाणा बनवण्यात आले. या भागात हिंदू अल्पसंख्यांक आहेत.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )