रामनवमीला सीतारामपंतास रामदर्शन

  47

समर्थ कृपा - विलास खानोलकर


सीतारामपंत नेने हे गारोडे येथील राहणारे. आपल्याला श्री रामाचा साक्षात्कार व्हावा; म्हणून राम उपासना कडकरीतीने करीत असत. पुढे समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटमध्ये आले. महाराजांचे दर्शन होताच, ते वैभव पाहून त्यांना अतिशय समधान वाटले आणि ‘मला आज राम भेटला’ असे त्यांना वाटले. मग माधुकरी मागून श्रींची सेवा करण्याकरिता ते तेथेच राहिले. त्यांनी सेवा अशी चालविली की, नित्य माधुकरी आणून जेवावे आणि श्रींसमोर राम उपासनेची माळ घेऊन जप करीत बसावे. त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाजवळ भाषण अगदी वर्ज्य केले होते. काही दिवस गेल्यावर एके दिवशी दोन प्रहरी त्यांस स्वप्नात रामरूपाने दर्शन दिले.


स्वामी समर्थ बखर गोपाळबुवा केळकर हे त्यावेळची इंग्रजी तिसरी शिकलेले होते. ते सुरुवातीस नास्तिक होते. परंतु त्यांना आस्तिक बनविण्यासाठी श्री स्वामींना वरील लीला करावी लागली.


“नरदेही नरसिंह। प्रगटला तरू पोटी। नास्तिकाच्या कश्यपूला। आस्तिकाची देण्या गती।।’


हाच तर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा गाभा आणि हेतू आहे. गोपाळबुवांसारख्या सुशिक्षित नास्तिकाला गती देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बखरीचे लिखाण करून घेण्यासाठीच श्री स्वामींना ही लीला करावी लागली.


जीवघेण्या दुखण्याला कंटाळून बुवा निर्वाणीचे बोलले, “जो कोणी या जगाताचा ईश्वर असेल, त्याने ८ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली, तर उरलेल्या माझ्या आयुष्यात त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही.” बुवांच्या या घोर प्रतिज्ञेने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. श्री स्वामींनी बुवांची व्याधी दूर केली. आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी गोपाळबुवा केळकरांची होती. ती त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या, ऐकून खात्री करून घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली. तीच ‘श्री स्वामी समर्थ बखर.’



रामनवमीचा स्वामी संदेश...


मनात जनात कामात ठेवा राम ।।१।।
रक्ताच्या थेंबाथेंबात राहतो राम
तुमच्यासाठी राम जेव्हा म्हणेल राम ।।२।।
स्वामी नाम प्रचंड सशक्त
रामासारखे व्हा तुम्ही पितृभक्त ।।३।।
रामासारखे व्हा तुम्ही मातृभक्त
रामासारखे व्हा तुम्ही गुरुभक्त ।।४।।
रामासारखे व्हा तुम्ही स्वामीभक्त
रामश्याम दत्तभक्त मातृभक्त ।।५।।
स्वामीभक्त रामाचे पाळा नियम
पाळा एक वचनी एक बाणी नियम ।।६ ।।
एक पत्नी, एक व्रती उत्तम नियम
बंधुप्रेम, देशप्रेम, प्राणी प्रेम नियम ।।७।।
निसर्गप्रेम नदिनाली प्रेम नियम
प्रेमवचन, पितृवचन सत्य नियम ।।८ ।।
साऱ्या जगात पाना पाण्यात राम
रानावनात फुलाफळात सुगंधी राम ।।९।।
चांगल्या कार्यात हसण्याबोलण्यात राम
लंकादहनात रावणा मारण्यात राम ।।१०।।
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सारे राम
सुग्रीव, अंगद, जांभुवत, हनुमान सारे राम ।।११।।
नर, वानर, जटायु, खार सारे राम
सुवर्ण हरीण, विभीषण एकक्षण राम ।।१२।।
तात्काळ पूर्ण करा चांगले काम
स्वच्छ ठेवा नदी-नाले देवधाम ।।१३।।
गंगा यमुना, जमुना, सीता, देवीधाम
भरपूर फुले, फळे झाडे लावा काम ।।१४।।
सर्व पृथ्वीच जगवणे रामाचे काम
अणुयुध्द टाळणे मानवजात वाचवणे काम ।।१५।।
अणुरेणुत दत्त, स्वामी एक नाम
दुःखे गोपाळ बुवांची दूर
केली घेता स्वामी नाम ।।१६ ।।
गोपाळ केळकरांच्या बखरीत स्वामी नाम
दिनरात तुम्ही घ्या राम स्वामी नाम ।।१७ ।।
रामनवमीला पूर्ण केली स्वामीनाम
जेथे जेथे ईश्वरनाम तेथे तेथे स्वामीनाम ।।१८।।
स्वामी भक्तासाठी उभे
भक्त स्वामीदर्शनार्थ उभे ।।१९।।
येई कधी स्वामी स्वप्नी
प्रत्येक भक्ताची अलग कथनी ।। २० ।।


vilaskhanolkarkardo@gmail.com



Comments
Add Comment

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण

सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: 'या' ५ राशींचे नशीब चमकेल, धनलाभ आणि प्रगतीचा योग!

मुंबई : भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे आणि नक्षत्रांचे परिवर्तन मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकते. याच

Horoscope: कर्क राशीत शुक्राचे गोचर, या तीन राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल घडत असतात. सुख,