Karela Benefits: हे फायदे ऐकल्यावर आजच कारले खाण्यास कराल सुरूवात

मुंबई: कारले खाण्यासाठी कडू जरी लागत असले तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. कॅन्सरचा धोकाही कमी होतो. इतकंच नव्हे तर पोटाच्या समस्येचा धोकाही कमी होतो. याच कारणामुळे आरोग्य तज्ञ कारले खाण्याचा सल्ला देतात.


कारले भले खाताना कडू लागत असले तर याचे फायदे जबरदस्त आहेत. ही भाजी पाहून अनेकजण नाके मुरडतात. मात्र हे खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. कारल्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. डायबिटीजच्या रुग्णांसाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही आहे.


हे खाल्ल्याने पाचनसंस्था चांगली राहते. शुगरच नव्हे तर बद्धकोष्ठता, हृदय, वेट लॉस आणि कोलेस्ट्रॉलमध्ये याचे बरेच फायदे होतात.


डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारले फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते डायबिटीजच्या रुग्णांनी याचा खाण्यात समावेश करावा. यातील गुण इन्सुलिन कंट्रोल करण्यास मदत करतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.


कारले खाल्ल्याने रक्त साफ होण्यास मदत होते. रक्ताशी संबंधित गंभीर आजारांची जोखीम असते. कारल्यामध्ये अल्फा लिपोईक अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील चरबी कमी करून धमन्यांचे आरोग्य चांगले राहते.


कारले खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पचनासारख्या समस्या दूर होतात. कारल्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.


कारले कॅन्सरची जोखीम कमी करण्याचे काम करतात. याचा ज्यूस पिणे शरीरासाठी लाभदायक असते. कारल्यामध्ये फ्लॅवेनॉईड्स, गार्डेनिया आणि बीटा कॅरोटीनसारखे केमिकल कंपाऊंड कॅन्सर रोखण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका