UAE Flood : दुबईत पावसाचा कहर! वाळवंट झाले जलमय

दुबई विमानतळ पाण्याखाली तर ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू


यूएई : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये काल वर्षभराचा पाऊस एकदाच आल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले आहे. इथल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. इतकेच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.


दुबई विमानतळावर काल अवघ्या बारा तासात सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात एकूण १६० मिमी पाऊस पडला. एकाच दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आलेल्या पुराचा दुबईच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळ पाण्याने भरले आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सल्लागार जारी केला होता ज्यात लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क केले होते.



बुधवारपर्यंत हवामान खराब राहण्याची शक्यता


रविवारी, १४ एप्रिल आणि सोमवारी, १५ एप्रिल रोजी ओमानच्या विविध भागांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे किमान १८ लोकांचा मृत्यू झाला, असे देशाच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीने सांगितले. तसेच बुधवार पर्यंत हवामान खराब राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



गेल्या वर्षीही दुबईत पूर


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही दुबईचे हवामान खराब झाले होते. वादळी पावसामुळे शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की प्रशासनाने लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई केली होती. उष्ण आणि वाळवंटी देशाच्या हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले.


Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी