Sion-Panvel Highway: वाहतूक कोंडीतून होणार मुंबईकरांची सुटका! शीव-पनवेल महामार्गाला जोडणार नवा पूल

  128

पनवेल : खारघरमध्ये प्रवेश करण्यासाठी कोपरा येथील मार्ग सोयीस्कर ठरतो. मात्र, तेथून बाहेर पडण्यासाठी वापरण्यात येणारा कोपरा पूल धोकादायक ठरत आहे. सध्या त्याचा एकेरी मार्ग सुरु आहे. मात्र त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रांजणपाडा, ओवे, कोपरा गावातील रहिवाशांसाठी हा पूल सोयीचा असला तरी तो धोकादायक स्थितीत असल्यामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना पनवेलकडे जाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतराचा फेरा मारुन सायन-पनवेल महामार्गावर जावे लागते. यामुळे, अवघ्या काही सेकंदाचे अंतर कापण्यासाठी नागरिकांना बराच वेळ वाहतूककोंडीत अडकावे लागते. पण आता सिडकोने याबाबतीत मोठे पाऊल उचचले आहे.


खारघरच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या कोपरा पूल परिसरातील वाहतूककोंडीचा प्रश्न आणि जीर्ण झालेल्या पुलावर उपाय म्हणून सिडको आणखी एक पुल बांधणार आहे. सिडकोने या पुलाचे बांधकाम हाती घेतले असून या कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा पुल थेट शीव-पनवेल सागरी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. सात मीटर रुंदीचा हा पूल असून या पुलामुळं खारघरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


दरम्यान, कोपरा पुलावर कायमस्वरुपी मोठा पूल नियोजित आहे. मात्र, पालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीमुळं यात अडथळा येत आहे. त्यामुळे या पुलाचे काम रखडले आहे. या मार्गावरील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने पुलाच्या स्वरुपाने तात्पुरता पर्याय काढला आहे. मुंबईकडे जाण्यासाठी कोपरा पुल हा एकमेव पर्याय असल्याने वाहनचालकांना नाइलाजास्तव विरुद्ध दिशेने वाहन चालवावी लागतात. मुंबईकडे जाण्यासाठी देखील पर्यायी मार्ग सिडकोने तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही