Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामनवमीचा उत्साह, भक्तांची उसळली मोठी गर्दी

  72

अयोध्या: राम मंदिर बनल्यानंतर अयोध्येत पहिल्यांदा रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्या नगरीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भक्तगण तेथे पोहोचत आहेत.


अशातच दर्शनाची सुविधेबाबत खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. आज सर्वांची नजर तिलक वर आहे. दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी सूर्य तिलक असेल जे साधारण चार मिनिटांपर्यंत राहील.


प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव रामनगरी अयोध्येत मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. राम जन्मभूमीचा परिसर फुलांनी सुंदर सजवला आहे. सुंदर रोषणाईनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. चपला-बूट ठेवण्यासोबतच भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी खास सोय करण्यात आली आहे.


इतर दिवसांच्या तुलनेत आज मोठ्या संख्येने भक्तगण अयोध्येत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ वाजता रामाचा जन्मोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणार आहे. राम जन्मभूमी परिसरात जागोजागी बॅरियर लावून भक्तांना रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन चाकी आणि चार चाकी वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे.


श्रीरामांच्या जन्मोत्सावाचे प्रसारण अयोध्या नगरीत साधारण शंभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.