Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामनवमीचा उत्साह, भक्तांची उसळली मोठी गर्दी

अयोध्या: राम मंदिर बनल्यानंतर अयोध्येत पहिल्यांदा रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्या नगरीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भक्तगण तेथे पोहोचत आहेत.


अशातच दर्शनाची सुविधेबाबत खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. आज सर्वांची नजर तिलक वर आहे. दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी सूर्य तिलक असेल जे साधारण चार मिनिटांपर्यंत राहील.


प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव रामनगरी अयोध्येत मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. राम जन्मभूमीचा परिसर फुलांनी सुंदर सजवला आहे. सुंदर रोषणाईनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. चपला-बूट ठेवण्यासोबतच भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी खास सोय करण्यात आली आहे.


इतर दिवसांच्या तुलनेत आज मोठ्या संख्येने भक्तगण अयोध्येत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ वाजता रामाचा जन्मोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणार आहे. राम जन्मभूमी परिसरात जागोजागी बॅरियर लावून भक्तांना रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन चाकी आणि चार चाकी वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे.


श्रीरामांच्या जन्मोत्सावाचे प्रसारण अयोध्या नगरीत साधारण शंभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या