Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामनवमीचा उत्साह, भक्तांची उसळली मोठी गर्दी

  76

अयोध्या: राम मंदिर बनल्यानंतर अयोध्येत पहिल्यांदा रामनवमी साजरी केली जात आहे. अयोध्या नगरीमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भक्तगण तेथे पोहोचत आहेत.


अशातच दर्शनाची सुविधेबाबत खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. आज सर्वांची नजर तिलक वर आहे. दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी सूर्य तिलक असेल जे साधारण चार मिनिटांपर्यंत राहील.


प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव रामनगरी अयोध्येत मोठ्या धामधुमीत साजरा केला जात आहे. राम जन्मभूमीचा परिसर फुलांनी सुंदर सजवला आहे. सुंदर रोषणाईनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. चपला-बूट ठेवण्यासोबतच भक्तांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी खास सोय करण्यात आली आहे.


इतर दिवसांच्या तुलनेत आज मोठ्या संख्येने भक्तगण अयोध्येत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ वाजता रामाचा जन्मोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जाणार आहे. राम जन्मभूमी परिसरात जागोजागी बॅरियर लावून भक्तांना रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन चाकी आणि चार चाकी वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. दर्शनाची वेळ वाढवून १९ तास करण्यात आली आहे.


श्रीरामांच्या जन्मोत्सावाचे प्रसारण अयोध्या नगरीत साधारण शंभर एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )