Salman khan: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने मंगळवारी सांगितले की दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विक्की गुप्ता आणि सागर पाल आहे. विक्की आणि सुनीलने रविवारी सलमान खानच्या वांद्रेस्थित अपार्टमेंटच्या बाहेर गोळीबार केला होता.


सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याच्या आधी दोघेही मुंबईच्या जवळील पनवेल परिसरातील सोसायटीमध्ये गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होते. या दोघांनी बॉलिवूड स्टारच्या घराची रेकी केली आणि गोळीबार केला. दोन्ही आरोपींना क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री भुज येथून अटक केली. आरोपी बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांना पुढील कारवाईसाठी भुजवरून मुंबईत आणले जाईल.



सकाळी ५ वाजता केला होता गोळीबार


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या वांद्रेस्थित गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड गोळीबार केला होता. ही घटना रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर दोनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान खान घरातच होता. दरम्यान, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.



बाईक सोडून पळाले होते हल्लेखोर


तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गोळीबारानंतर हल्लेखोरांनी मोटारसायकल सलमानच्या घरापासून साधारण एक किमी अंतरावर सोडून दिली होती. त्यानंतर हल्लेखोर काही वेळ चालत गेले आणि वांद्रे स्टेशनसाठी त्यांनी एक ऑटोरिक्शा केली. तेथून आरोपी बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले मात्र सांताक्रुझ स्टेशनवर उतरले आणि तेथून बाहेर पडले. यानंतर ते मुंबईतून फरार होत गुजरातच्या भुज येथे जाऊन लपले.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री