Video: धोनीने पुन्हा दाखवले रौद्र रूप, ५००च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league) ज्या सामन्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सामना रविवारी १४ एप्रिलला खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ खेळण्यासाठी उतरला होता.


हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईसमोर धावांचा डोंगर उभा केला. सलामीसाठी अजिंक्य रहाणेला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिली विकेट पडल्यानंतर डाव सांभाळला.


४० बॉलमध्ये ५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकत या स्टार क्रिकेटरने ६९ धावांची खेळी केली. शिवम दुबेने या सामन्यात ३८ बॉलवर नाबाद ६६ धावांची खेळी केली. अखेरीस महेंद्रसिंग धोनीने २० धावा करत स्कोर २०० पार पोहोचवला.


 


धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर पाय ठेवला आणि ५००च्या स्ट्राईक रेटने धावांचे वादळ आणले. १९.२ षटकांत विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या माहीने ४ बॉलमध्ये ३ षटकार ठोकत २० धावा केल्या. हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर करत होता आणि त्याने दुसऱ्या बॉलमध्ये डॅरेल मिचेलची विकेट मिळवली. यानंतर धोनी आला आणि त्याने सलग ३ षटकार ठोकत मुंबईच्या कर्णधाराची लाईन लेंथ बिघडवली.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण