Video: धोनीने पुन्हा दाखवले रौद्र रूप, ५००च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

  70

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league) ज्या सामन्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सामना रविवारी १४ एप्रिलला खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ खेळण्यासाठी उतरला होता.


हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईसमोर धावांचा डोंगर उभा केला. सलामीसाठी अजिंक्य रहाणेला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिली विकेट पडल्यानंतर डाव सांभाळला.


४० बॉलमध्ये ५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकत या स्टार क्रिकेटरने ६९ धावांची खेळी केली. शिवम दुबेने या सामन्यात ३८ बॉलवर नाबाद ६६ धावांची खेळी केली. अखेरीस महेंद्रसिंग धोनीने २० धावा करत स्कोर २०० पार पोहोचवला.


 


धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर पाय ठेवला आणि ५००च्या स्ट्राईक रेटने धावांचे वादळ आणले. १९.२ षटकांत विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या माहीने ४ बॉलमध्ये ३ षटकार ठोकत २० धावा केल्या. हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर करत होता आणि त्याने दुसऱ्या बॉलमध्ये डॅरेल मिचेलची विकेट मिळवली. यानंतर धोनी आला आणि त्याने सलग ३ षटकार ठोकत मुंबईच्या कर्णधाराची लाईन लेंथ बिघडवली.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र