Video: धोनीने पुन्हा दाखवले रौद्र रूप, ५००च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league) ज्या सामन्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो सामना रविवारी १४ एप्रिलला खेळवण्यात आला. चेन्नई सुपर किंग्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ खेळण्यासाठी उतरला होता.


हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईसमोर धावांचा डोंगर उभा केला. सलामीसाठी अजिंक्य रहाणेला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरला. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाडने पहिली विकेट पडल्यानंतर डाव सांभाळला.


४० बॉलमध्ये ५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकत या स्टार क्रिकेटरने ६९ धावांची खेळी केली. शिवम दुबेने या सामन्यात ३८ बॉलवर नाबाद ६६ धावांची खेळी केली. अखेरीस महेंद्रसिंग धोनीने २० धावा करत स्कोर २०० पार पोहोचवला.


 


धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा


चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर पाय ठेवला आणि ५००च्या स्ट्राईक रेटने धावांचे वादळ आणले. १९.२ षटकांत विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या माहीने ४ बॉलमध्ये ३ षटकार ठोकत २० धावा केल्या. हार्दिक पांड्या शेवटची ओव्हर करत होता आणि त्याने दुसऱ्या बॉलमध्ये डॅरेल मिचेलची विकेट मिळवली. यानंतर धोनी आला आणि त्याने सलग ३ षटकार ठोकत मुंबईच्या कर्णधाराची लाईन लेंथ बिघडवली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि