IPL 2024: फिल सॉल्ट, श्रेयस अय्यरचे वादळ, केकेआरला जिंकवून दिला चौथा सामना

  37

मुंबई: आयपीएल २०२४मधील २८वा सामना आज १४ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने शानदार ८ विकेटननी विजय मिळवला. केकेआरने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला.


केकेआरसाठी फिल सॉल्टने शानदार अर्धशतकी खेळी केली. हा कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएलमधील चौथा विजय आहे. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या लखनऊला तशी काही विशेष कामगिरी करता आली नाही. लखनऊला २० षटकांत केवळ १६२ धावा करता आल्या.


१६३ धावांचे आव्हान घेऊन केकेआरचा संघ मैदानात उतरला. केकेआरसाठी सलामीची भूमिका निभावणाऱ्या फिल सॉल्टने वादळी खेळी केली. त्याने ४७ बॉलमध्ये ८९ धावा ठोकल्या. श्रेयस अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली. अय्यरने ३८ बॉलमध्ये ३८ धावा केल्या.


लखनऊसाठी केवळ मोहसिन खाननने २ विकेट मिळवल्या. याशिवाय कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या विजयासह केकेआरच्या संघाचे ८ गुण झाले आहेत. ते पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. केकेआरच्या वर राजस्थान रॉयल्स आहेत ज्यांचे १० पॉईंट्स आहेत. केकेआरचा पुढील सामना राजस्थानविरुद्ध आहे. १६ एप्रिलला दोन्ही संघ आमनेसामने असतील.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी