Health: वर्कआऊटदरम्यान, अधिक पाणी पिणे ठरू शकते धोकादायक

मुंबई: वर्कआऊट करताना पाणी पिणे गरजेचे आहे मात्र तुम्हाला माहीत आहे की अधिक पाणी पिण्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात. हा, खरंतर जर तुम्ही वर्कआऊटदरम्यान खूप पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया अधिक पाणी तोटे...


वर्कआऊटदरम्यान आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर आपल्या रक्तात सोडियमचा स्तर कमी होऊ शकतो. याला हायपोनॅट्रेमिया म्हणतात जो खूप धोकादायक असतो. सोडियम आपल्या शरीरासाठी गरजेचे आङे. कारण हे पेशी आणि मसल्सला काम करण्यास मदत करतात.


अधिक पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, थकवा, कसेतरी होणे या समस्या सतावू शकतात. अशातच लगेचच पाणी पिणे बंद करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.



योग्य प्रमाणात पाणी प्या


प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. वर्कआऊठदरम्यान दर २० मिनिटांनी साधारण २४० मिलीलीटर पाणी प्यायले पाहिजे. मात्र हे प्रमाण तुमच्या शारिरीक हालचाली, हवामान आणि येणारा घाम यावर अवलंबून आहे. वर्कआऊटआधी आणि नंतर पाणी पिण्यासोबतच इलेक्ट्रोलाईट्स असलेल्या ड्रिंक्सचे भरपूर सेवन केले पाहिजे.


व्यायामाच्या आधी जर तुम्ही चांगल्या प्रमाणात पाणी पित असाल तर यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच व्यायाम करताना दर २० मिनिटांनी पाणी प्यायले पाहिजे यामुळे थकवा जाणवणार नाही. तसेच शरीर योग्य पद्धतीने काम करू शकेल.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे