Health: वर्कआऊटदरम्यान, अधिक पाणी पिणे ठरू शकते धोकादायक

मुंबई: वर्कआऊट करताना पाणी पिणे गरजेचे आहे मात्र तुम्हाला माहीत आहे की अधिक पाणी पिण्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात. हा, खरंतर जर तुम्ही वर्कआऊटदरम्यान खूप पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया अधिक पाणी तोटे...


वर्कआऊटदरम्यान आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर आपल्या रक्तात सोडियमचा स्तर कमी होऊ शकतो. याला हायपोनॅट्रेमिया म्हणतात जो खूप धोकादायक असतो. सोडियम आपल्या शरीरासाठी गरजेचे आङे. कारण हे पेशी आणि मसल्सला काम करण्यास मदत करतात.


अधिक पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, थकवा, कसेतरी होणे या समस्या सतावू शकतात. अशातच लगेचच पाणी पिणे बंद करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.



योग्य प्रमाणात पाणी प्या


प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. वर्कआऊठदरम्यान दर २० मिनिटांनी साधारण २४० मिलीलीटर पाणी प्यायले पाहिजे. मात्र हे प्रमाण तुमच्या शारिरीक हालचाली, हवामान आणि येणारा घाम यावर अवलंबून आहे. वर्कआऊटआधी आणि नंतर पाणी पिण्यासोबतच इलेक्ट्रोलाईट्स असलेल्या ड्रिंक्सचे भरपूर सेवन केले पाहिजे.


व्यायामाच्या आधी जर तुम्ही चांगल्या प्रमाणात पाणी पित असाल तर यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच व्यायाम करताना दर २० मिनिटांनी पाणी प्यायले पाहिजे यामुळे थकवा जाणवणार नाही. तसेच शरीर योग्य पद्धतीने काम करू शकेल.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि