Health: वर्कआऊटदरम्यान, अधिक पाणी पिणे ठरू शकते धोकादायक

मुंबई: वर्कआऊट करताना पाणी पिणे गरजेचे आहे मात्र तुम्हाला माहीत आहे की अधिक पाणी पिण्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात. हा, खरंतर जर तुम्ही वर्कआऊटदरम्यान खूप पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घेऊया अधिक पाणी तोटे...


वर्कआऊटदरम्यान आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलो तर आपल्या रक्तात सोडियमचा स्तर कमी होऊ शकतो. याला हायपोनॅट्रेमिया म्हणतात जो खूप धोकादायक असतो. सोडियम आपल्या शरीरासाठी गरजेचे आङे. कारण हे पेशी आणि मसल्सला काम करण्यास मदत करतात.


अधिक पाणी प्यायल्याने तुम्हाला डोकेदुखी, थकवा, कसेतरी होणे या समस्या सतावू शकतात. अशातच लगेचच पाणी पिणे बंद करावे आणि डॉक्टरांशी संपर्क साधावा.



योग्य प्रमाणात पाणी प्या


प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची पाण्याची गरज वेगवेगळी असते. वर्कआऊठदरम्यान दर २० मिनिटांनी साधारण २४० मिलीलीटर पाणी प्यायले पाहिजे. मात्र हे प्रमाण तुमच्या शारिरीक हालचाली, हवामान आणि येणारा घाम यावर अवलंबून आहे. वर्कआऊटआधी आणि नंतर पाणी पिण्यासोबतच इलेक्ट्रोलाईट्स असलेल्या ड्रिंक्सचे भरपूर सेवन केले पाहिजे.


व्यायामाच्या आधी जर तुम्ही चांगल्या प्रमाणात पाणी पित असाल तर यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच व्यायाम करताना दर २० मिनिटांनी पाणी प्यायले पाहिजे यामुळे थकवा जाणवणार नाही. तसेच शरीर योग्य पद्धतीने काम करू शकेल.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष