मोबाईल धारकांना बसणार महागाईचा भडका?

सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!


मुंबई : आजच्या या आधुनिक युगात मोबईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यातील मोबाईल हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र याच मोबाईलमुळे देशातील सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.



मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता


मोबाइल बिल, ब्रॉडबँडचे बिल वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम उद्योगात १५ ते १७ टक्के दरवाढ होईल, याचा फायदा एअरटेलला होईल, असा अंदाज अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये २० टक्क्यांची शेवटची वाढ करण्यात आली होती. टॉप दोन कंपन्या प्रीपेड मोबाइल सेवा वापरणाऱ्यांसाठी कमीत कमी रिचार्जची किंमत वाढवत आहेत. शिवाय रिचार्जचा दर तोच ठेवून कालावधी कमी करण्याची शक्कल लढवताना दिसत आहेत. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे

मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे