मोबाईल धारकांना बसणार महागाईचा भडका?

  94

सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!


मुंबई : आजच्या या आधुनिक युगात मोबईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यातील मोबाईल हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र याच मोबाईलमुळे देशातील सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत देशातील दूरसंचार कंपन्या (Telecom Company) लवकरच आपल्या मोबाईल टॅरिफ प्लॅन्समध्ये (Mobile Tariff Plans) वाढ करणार असल्याचे सांगितले आहे.



मोबाईल टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची शक्यता


मोबाइल बिल, ब्रॉडबँडचे बिल वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम उद्योगात १५ ते १७ टक्के दरवाढ होईल, याचा फायदा एअरटेलला होईल, असा अंदाज अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये २० टक्क्यांची शेवटची वाढ करण्यात आली होती. टॉप दोन कंपन्या प्रीपेड मोबाइल सेवा वापरणाऱ्यांसाठी कमीत कमी रिचार्जची किंमत वाढवत आहेत. शिवाय रिचार्जचा दर तोच ठेवून कालावधी कमी करण्याची शक्कल लढवताना दिसत आहेत. तसे झाल्यास आता मोबाईल वापरणे महागडे ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी