Arun Govil: छोट्या पडद्यावर गाजवली रामाची भूमिका; पण राजकारणी झाल्यानंतर अभिनयाला रामराम!

कोण आहे 'हा' अभिनेता?


मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळत आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री आता राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच प्रभू राम म्हणून ओळखले जाणारे अरुण गोविल (Arun Govil) यांचाही समावेश आहे. छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल घराघरांत पोहोचले. श्री रामाची भूमिका साकारुन त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.


अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपाने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथ या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला रामराम करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


अरुण गोविल आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप उत्साही आहेत. नुकतेच त्यांनी अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडल्याचे उघडपणे सांगितले आहे. 'अभिनयक्षेत्रापासून वेगळ्या असलेल्या माझ्या कारकिर्दीची ही एक नवीन इनिंग आहे आणि मी याबद्दल खूप उत्सुक आहे. आता हा नवा प्रवास कसा असेल याची मलाही उत्सुकता आहे' असे अरुण गोविल यांनी सांगितले. तसेच अरुण गोविल पुढे म्हणाले की,"याआधीदेखील मला राजकीय पक्षांकडून निवडणुकीला उभं राहण्याची विचारणा झाली आहे. पण त्यावेळी राजकारणात येण्याचा मी काहीही विचार केला नव्हता. राजकारणाचा प्रवास कसा होतोय यावर पुढची गणितं अवलंबून असतील. सध्या मी यावर उघडपणे काहीही बोलू इच्छित नाही. सध्यातरी माझं संपूर्ण लक्ष आगामी निवडणुकांवर आहे"असे अरुण गोविल यांनी सांगितले.


'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील अरुण गोविल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना हे फोटो पाहता आले नव्हते. अरुण गोविल सध्या त्यांच्या 'रामायण' चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.


Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल