देशात तापमानाचा पारा वाढणार! पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

  71

नवी दिल्ली: भारताच्या हवामान विभागाकडून एप्रिल आणि जून दरम्यान सामन्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा असणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी हीटव्हेव सीजनच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयानुसार या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी एप्रिल ते जून दरम्यान तापमानाच्या पूर्वानुमानासंबंधी माहिती देण्यात आली.


या चर्चेमध्ये आरोग्य क्षेत्रातील तयारींबाबतही आढावा घेण्यात आला. यामध्ये उष्णतेच्या लाटांचा परिणाम कमी होण्यासाठी आवश्यक औषधे, ड्रिप आणि पेयजल यांचा पुरेसा पुरवठा हे मुद्दे सामाविष्ट होते.


पीएमओने आपल्या विधानात म्हटले की पंतप्रधान मोदींनी एकजूट, तसेच समग्र सरकारच्या नजरेने पाहण्याची गरज आहे. यात केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील प्रशासन आणि विविध मंत्रालयांनी योग्य तो समन्वय साधावा असा आग्रहही यावेळी पंतप्रधानांनी केला.


या बैठकीत पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृह सचिव, भारत हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख अधिकारी सामील होते.


एकीकडे भारतात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. यात हजारो लोक राजकीय रॅली तसेच मतदान केंद्रांवर रांगेमध्ये दिसणार आहेत. सात टप्प्यात होणारी ही निवडणूक १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. १ जूनला मतदान संपणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )