Kangana Ranaut: ...तर मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन!

मनालीमधून कंगना रणौतची काँग्रेसवर बोचरी टीका


राहुल गांधींना दिलं खुलं आव्हान


शिमला : अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशच्या मंडीतील भाजपा उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे कंगना रणौत चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र त्यावरुन मोठा गहजब झाल्यानंतर त्यांनी ती डिलिट केली. आता कंगनाने हिमाचलमधल्या मनालीमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत राहुल गांधींना पप्पू म्हणत आव्हान दिलं आहे.


“काँग्रेसचा विचार हा महिलांविरोधी आहे. नवरात्र उत्सव सुरु असतानाही त्यांचा महिला विरोधी विचार समोर येतो आहे. मला जेव्हापासून तिकिट मिळालं आहे या काँग्रेसच्या लोकांना मिरची लागली आहे. माझा अपमान केला जातो आहे, मला कलंकित केलं जातं आहे. असे कंगनाने प्रचार सभेत सांगितले. तसेच पुढे एक मोठा पप्पू दिल्लीत बसला आहे, आपल्याकडे एक छोटा पप्पू आहे. तो म्हणे मी गोमांस खाते, त्याच्याकडे व्हिडीओ आहे. त्याने व्हिडीओ दाखवावा, त्याच्याकडे पुरावा असेल तर त्याने तो सादर करावा. पण ते तो करणार नाही कारण तो छोटा पप्पू खोटारडा आहे, असेही कंगनाने म्हटले. दिल्लीतील मोठा प्पपू म्हणजेच राहुल गांधी यांना शक्तिचा विनाश करायचा आहे असे म्हणतात. त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? ” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.



मला अपवित्र, कलंकित का ठरवलं जातं ?


“माझ्यावर टीका केली जाते की मी अपवित्र आहे. मी देवभूमीत जायला पाहिजे. मला का अपवित्र, कलंकित ठरवलं जातं आहे. माझा महिला भगिनींना सवाल आहे या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांनी आपलं स्थान निर्माण करायचं नाही का? केंद्रात किती महिला मंत्री आहेत? राज्यांमध्ये किती महिला मंत्री आहेत? आपल्या मुलींचं भविष्य आहे का? तुमच्या मनालीची मुलगी म्हणजे मी स्वतःचं अस्तित्व शोधते आहे तर यांना मिरची का लागते? एकीकडे या प्रकारची घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून ३३ टक्के आरक्षण दिलं आहे.” असं कंगनाने म्हटले.



आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते


कंगना रणौतने धमक्या देणाऱ्या व घाबरवणाऱ्या सगळ्या लोकांना खुलं आव्हान केलं आहे. राजकारण ही तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. हा नरेंद्र मोदींचा नवा भारत आहे. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी येते व ढिंकचॅक करते. मी त्याला (राहुल गांधी) इथे बोलवू इच्छिते, त्याने माझ्या चित्रपटातला एक सीन मला करुन दाखवावा. तो सीन जर त्याने करुन दाखवला की मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन. असे आव्हान कंगनाने राहुल गांधींना केले आहे. आपण कलेला निवडत नसतो, कला आपल्याला निवडत असते हे बोलणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. कंगनाला राजकारण येतं का? असं विचारणाऱ्या सगळ्यांना ४ जूननंतर आपोआप उत्तर मिळेल, असंही कंगनाने म्हटले.


Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण