Transgender: पुण्यात तृतीयपंथांच्या गैरवागणुकीवर नवी नियमावली जाहीर

  47

'हे' असणार नियम


पुणे : अनेक ठिकाणी तृतीयपंथी नागरिकांकडून जबरदस्तीने पैशांची मागणी करतात. रेल्वे, रस्ते, लग्न समारंभ, विविध सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, बारसे, नामकरण विधी अशा बऱ्याच कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथीयांकडून पैशांची मागणी केली जाते. मात्र आता अशा वागणुकीमुळे पुण्यातील वाहतूक शाखा,पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि बीट मार्शलकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


पुणे शहरातील चौकांमध्ये सिग्नलला आणि धार्मिक कार्यक्रमात घरी जाऊन नागरिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त यांनी दिले आहेत. निमंत्रण नसताना बऱ्याचदा पैशांसाठी जबरदस्ती केली जाते. शहरातील मुख्य चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहनचालक आणि नागरिकांना पैशांसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.



हे आहेत नियम



  •  तृतीयपंथीयांना नागरिकांच्या घरी आणि दुकानांमध्ये जाऊन जबरदस्तीने पैसे मागण्यास मनाई राहील.

  • लग्न, बारसे, अंत्यविधी, उत्सव अशा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय जाता येणार नाही.

  • मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पैशांची मागणी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.


तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. भिक्षेकऱ्यांकडून लहान मुलांचा वापर करणे गंभीर गुन्हा आहे. अशा भिक्षेकऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त यांनी दिला.
Comments
Add Comment

कल्याणमध्ये डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू

केडीएमसी क्षेत्रात नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कल्याण (प्रतिनिधी): कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात

श्रावणाची चाहूल, भाज्यांचे दर कडाडले

टोमॅटो, फ्लॉवरचे भाव दुप्पट, तर कोथिंबिरीचे दर घसरले पेण(स्वप्नील पाटील) : अवघ्या दोन आठवड्यांवर श्रवण महिना आला

Jansurksha Bill : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: बहुचर्चित 'राज्य जनसुरक्षा विधेयक' अखेर आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं आहे. शहरी नक्षलवाद

गुरूपौर्णिमेच्या दिवशी घडली दुर्देवी घटना, भाविकांच्या वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

इगतपुरी : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला

शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार

राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९ हजार ८८९

शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द, मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - रूपाली चाकणकर

शहापूर: शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग