LokSabha Election 2024: भाजपा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर!

Share

‘या’ जागांचा सस्पेन्स अजूनही कायम

मुंबई : देशात लोकसभा निवडणूक (LokSabha Election 2024) एकूण सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीला ८ दिवस बाकी असून भाजपा उमेदवारांची ११ वी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून अद्यापही महाराष्ट्रातील काही जागांचा सस्पेन्स कायम आहे.

भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील ७१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अजूनही कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील सातारा आणि रत्नागिरी या लोकसभा मतदार संघाचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही या जागांचा सस्पेन्स कायम आहे.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago