LokSabha Election 2024: भाजपा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर!

'या' जागांचा सस्पेन्स अजूनही कायम


मुंबई : देशात लोकसभा निवडणूक (LokSabha Election 2024) एकूण सात टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. निवडणुकीला ८ दिवस बाकी असून भाजपा उमेदवारांची ११ वी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून अद्यापही महाराष्ट्रातील काही जागांचा सस्पेन्स कायम आहे.


भारतीय जनता पक्षाकडून (BJP) लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील ७१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे अजूनही कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे.


दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील सातारा आणि रत्नागिरी या लोकसभा मतदार संघाचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही या जागांचा सस्पेन्स कायम आहे.

Comments
Add Comment

पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई

हिवाळ्यातील सुपरफूड! तीळ खाल्ल्याने हृदय, हाडे आणि त्वचेला मिळतात फायदे. जाणून घ्या जबरदस्त फायदे

तीळ खाण्याचे फायदे जाणून तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल. तीळ केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठी एक सुपरफूड

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आगामी मराठी चित्रपट 'आशा'ची विशेष स्क्रीनिंग! आशा सेविकांचा भरभरून प्रतिसाद

मुंबई: जागतिक कन्या दिनानिमित्त 'आशा' या चित्रपटचे विशेष स्क्रिनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडले. या विशेष

'मनाचे श्लोक' चित्रपटाबाबत मृण्मयीचा मोठा निर्णय! 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई: अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा मराठी चित्रपट १० ऑक्टोबर रोजी राज्यभर

संपूर्ण देशातील मतदार याद्यांचे टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण

देशातील मतदार यादींचे गहन पुनरावलोकन (एसआयआर) लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर

टेक कंपनी गुगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी आंध्र प्रदेशातील