मुंबई : लोकसभा निवडणुकांना सुरुवात होताच भाजपा नेते अनंतकुमार हेगडे यांनी ४०० पार बहुमत आले की, संविधान बदलणार असे जाहीरपणे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागाराने संविधान बदलले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र नाना पटोले यांच्या टिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
“काय झाडी… काय डोंगर… एकदम सगळं कसं ओके… काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !” असं म्हणत आशिष शेलार यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “काय झाडी..! काय डोंगर…!! महायुतीमध्ये एकदम ओके..! आघाडीत एकमेकांना एकमेकांचेच धोके ! वर्षानुवर्षे काँग्रेसला काँग्रेसनेच हरवलं, त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचं ठरवलं. या गटाच्या मैत्रीला तर दुष्मनाची ही नाही येणार सर, ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर!”
“साहेबांच्या गटाची तर काय सांगावी ख्याती? गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार आपली ताई आणि आपली बारामती!! काय झाडी… काय डोंगार… एकदम सगळं कसं ओके… काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके !” असे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…