Vasant More: मी कलाकार आहे की कार्यकर्ता ते समजेल

वंचितच्या वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार


पुणे : जितेंद्र आव्हाड हे माझ्यापेक्षाही मोठे कलाकार आहेत. वसंत मोरे हा कलाकार नाही. त्यांना वसंत मोरे समजला नाही. समजायचे असेल तर त्यांना पुण्यात यावे लागेल. पुण्यात वसंत मोरेंचे काम पाहावे लागेल. त्यानंतर वसंत मोरे कलाकार आहे की कार्यकर्ता हे समजेल, असा पलटवार वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी आव्हाडांवर केला आहे.


वसंत मोरे म्हणाले की, चेहऱ्यावरून नव्हे तर वसंत मोरेंच्या कामावरून प्रकाश आंबेडकर मला ओळखतात. ही माझी पावती आहे. जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचे काम बघायची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवक आहेत. तिथे १५ वर्षांत मी केलेले काम पाहायचे असेल तर जितेंद्र आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेचे काम काय, किती लोकांसाठी काम करतो हे कळेल, असे उत्तर मोरेंनी दिले.


घरात बोलावून मारणाऱ्यांना सर्वसामान्यांचे काय दु:ख कळणार


त्याशिवाय एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता इतक्या खालच्या पातळीवर बोलत असेल. मी मुरलीची मुरली वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल. पुण्यात आले, इथे बोलले, जितेंद्र आव्हाडांनी जो गरिबांवर अन्याय केलाय, फेसबुकवर लिहिलेल्या एकाला घरात बोलावून मारले, अशा नेत्याला सर्वसामान्यांचे दु:ख काय कळणार आहे. वसंत मोरेंचे तुम्हाला आव्हान आहे. मी काय काम केले असेल ते पाहायला पुण्यात या, असे वसंत मोरे यांनी म्हटले.



गोड आठवणी माणसाने विसरू नये


गुढीपाडव्यानिमित्त आज १०० टक्के शिवतीर्थाची आठवण येते, आज पहिल्यांदाच गुढी उतरताना मी माझ्या घरी असेन. गेली कित्येक वर्षे मी गुढी उतरताना मुंबईत शिवतीर्थावर होतो. आज मी घरी असणार आहे. आता त्या विषयात जाऊ शकत नाही. ज्या आठवणी आहेत त्या कायम राहतात. गोड आठवणी माणसाने कधी विसरू नये आणि मी ते विसरणारही नाही, काही आठवणी या असे भाष्य वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावर केले. वसंत मोरे हे थेट संपर्कावर भर देत आहेत.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य