Harbour Line : मुंबईकरांना दिलासा! हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार

कधी होणार प्रवास सुरु?


मुंबई : प्रवाशांची होणारी धावपळ आणि गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने (western railway) हार्बर मार्गाचा (Harbour Line) बोरिवलीपर्यंत दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गावर लोकल ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे हार्बर रेल्वेचा मार्ग ८ किलोमीटरने वाढणार आहे. या प्रकल्पाचं काम २०२७-२८ या वर्षात पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.


हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण केल्याने पश्चिम मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली स्टेशनदरम्यानची लोकल गर्दी कमी होण्यास मदत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा मे महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे. तर या प्रकल्पाचं काम १५ जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८२५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गोरेगाव ते मालाडपर्यंत स्टेशनचा विस्तार होणार आहे. तर मालाड ते बोरिवली या दुसऱ्या टप्यात ५ किलोमीटरचं काम पूर्ण होईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


सध्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेन या सीएसएमटी ते गोरेगाव स्टेशनपर्यंत रेल्वेसेवा सुरु आहे. मागच्या वेळी हार्बर मार्गावर अंधेरी ते गोरेगाव हा टप्पा वाढविण्यात आला होता. या टप्प्याचं काम २०१८ पर्यंत पूर्ण झालं होतं. दरम्यान, बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरण करण्यासाठीचं प्राथमिक काम पूर्ण झालं आहे. या कामासाठी भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, झाडांचे ड्रोन सर्वेक्षण आदी कामांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार असल्याचेही नमूद केले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)