Health: आले-तुळसने बनलेले हे ड्रिंक करणार वेटलॉस, काही महिन्यात पोट होईल कमी

मुंबई: खराब लाईफस्टाईलमुळे हल्ली लठ्ठपणाची(obesity) समस्या सामान्य बनत चालली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. आम्ही तुम्हाला तुळस, मध आणि आल्यापासून बनणाऱ्या अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होईल.


तुळशीमध्ये युजेनॉल नावाचे आवश्यक तेल असते जे पचनसंस्थेसाठी अतिशय फायदेशीर असते. यासोबतच हाडांचे दुखणेही कमी होते.


तर आल्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्व असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच शरीरातून एक्स्ट्रा फॅट बाहेर निघण्यास मदत होते.


आले आणि तुळस यांनी बनलेले हे स्पेशल ड्रिंक बनवण्यासाठी पाच ते सहा ताजी तुळशीची पाने आणि आल्याचा एक तुकडा घ्या.


एका भांड्यात पाणी घ्या. त्यात तुळस आणि आले टाका आणि पाणी अर्धे होत नाही तोपर्यंत उकळा.


उकळल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि एका ग्लासात घ्या. स्वादासाठी तुम्ही यात मध मिसळू शकता. हळू हळू हे मिश्रण प्या.


हे मिश्रण सकाळी प्यायल्यास अधिक फायदेशीर आहे. दररोज याचे सेवन केल्यास महिन्याभरात याचे परिणाम दिसण्यास सुरूवात होईल.

Comments
Add Comment

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे