Congress Candidate: राज्यात लोकसभेसाठी काँग्रेसकडून आणखी दोन उमेदवार रिंगणात

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेसने(congress) दोन आणखी जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. धुळे मतदारसंघातून शोभा दिनेश आणि जालना मतदारसंघातून कल्याण काळे यांना तिकीट दिले आहे. महाराष्ट्रासाठी काँग्रेसची ही चौथी यादी आहे. कल्याण काळे यांची लढत भाजपच्या राव साहेब दानवे यांच्याविरुद्ध होणार आहे. तर शोभा यांच्यासमोर भाजपच्या सुभाष भामरे यांचे आव्हान आहे. मुंबईचया जागांवर आतापर्यंत कांग्रेस उमेदवारांची घोषणा केलेली नाही.



काँग्रेसने १७ पैकी १५ जागांवर उतरवले उमेदवार


महाराष्ट्रात जागा वाटपांतर्गत काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. याआधीच्या पहिल्या तीन यादीत काँग्रेसने आपल्या खात्यातील १५ जागांवर उमेदवार उतरवले होते. चौथ्या यादीत आणखी दोन नावांसह एकूण १५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. काँग्रेस दोन आणखी जागांवर उमेदवार देणार आहे.



या जागांवर निवडणूक लढवणार काँग्रेस


जागा वाटपात काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि रामटेक या जागा मिळाल्या आहेत.



या जागांवर लढत आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष सर्वाधिक २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. उद्धव ठोकरे यांनी आपल्या खात्यातील सर्व जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणार, हातकणंगले, औरंगाबाद, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर पूर्व हे मतदारसंघ मिळाले आहेत.

Comments
Add Comment

Heavy Rainfall Warning : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून

Mumbai News : मस्जिद बंदर येथे म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; ६ जणांची सुटका, २ जखमी

मुंबई: मुंबईतून एक मोठी दुर्घटना टळल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी दुपारी मुंबईतील अत्यंत दाट वस्तीच्या आणि

Devendra Fadnavis : मी राज्यात समाधानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर भाष्य; संत तुकारामांच्या अभंगाचा संदर्भ देत या चर्चांना पूर्णविराम मुंबई :

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी