Chandrashekhar Bawankule: मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते?

  119

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला


मुंबई : मविआचे सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होते? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. सचिन वाझेची नियुक्ती करून महिन्याला १०० कोटींची वसुलीची सुरूवात कोणी केली होती?,' असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे.


महाविकास आघाडीने मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.


उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ‘यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकणार.', असे मत त्यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्वात अडीच वर्षे राज्याला लुटले ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जी टीका करत आहेत. हा एक मोठा विनोद आहे,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.



४ जूननंतर घरात बसून राहण्याचे काम करावे लागेल


‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. तुकडे गँगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामाही उद्धव ठाकरेंना प्रिय वाटतोय. पण उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावं २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही राहुल गांधींना जनता मतदानातून धडा शिकवणार आहे. ४ जूननंतर उबाठांना घरात बसूनच राहावे लागणार’ असल्याचे बावनकुळे यांनी सांंगितले.

Comments
Add Comment

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी