Chandrayaan 4 Update: चांद्रयान-४ बाबत मोठी अपडेट!

इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले की, “पुढील टप्पा..…”


चांद्रयान ३ (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्या आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी २०२४ पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ (Chandrayaan 4) चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सातत्यापूर्ण शोध आवश्यक आहे. एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना एस सोमनाथ यांनी कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे, असे सांगितले.


“चांद्रयान मालिकेतील चांद्रयान ४ ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रगतीशील प्रयत्न सुरू आहेत. २०४० मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चंद्र संशोधन चालू झाले आहे”, असं सोमनाथ म्हणाले. “चांद्रयान ४ हे या दिशेने पहिले पाऊल आहे. चंद्रावर यानाचे पाऊल टाकणे आणि नमुना गोळा करून ते पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याचे असं चक्र असणार आहे”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.


सोमनाथ यांनी रॉकेट, उपग्रह (Satellite) उपक्रमांपासून ते तंत्रज्ञान विकास प्रयत्नांपर्यंतच्या प्रकल्पांच्या विविध पोर्टफोलिओची रुपरेषा मांडली. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इस्रोचा (ISRO) बहुआयामी दृष्टीकोन अधोरेखित करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी