Chandrayaan 4 Update: चांद्रयान-४ बाबत मोठी अपडेट!

इस्रोच्या प्रमुखांनी सांगितले की, “पुढील टप्पा..…”


चांद्रयान ३ (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने इतर अनेक मोहिमा राबवल्या आहेत. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी २०२४ पर्यंत मानवयान चंद्रावर पाठवण्याची मोहिमेबाबत मोठी अपडेट दिली आहे. चांद्रसंशोधनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी चांद्रयान ४ (Chandrayaan 4) चे महत्त्व अधोरेखित करताना एस. सोमनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२४ पर्यंत चंद्रावर भारतीय यान उतरवण्याचे ठरवलेले उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी सातत्यापूर्ण शोध आवश्यक आहे. एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना एस सोमनाथ यांनी कार्यक्रमाचा पुढील टप्पा सध्या प्रगतीपथावर आहे, असे सांगितले.


“चांद्रयान मालिकेतील चांद्रयान ४ ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रगतीशील प्रयत्न सुरू आहेत. २०४० मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे चंद्र संशोधन चालू झाले आहे”, असं सोमनाथ म्हणाले. “चांद्रयान ४ हे या दिशेने पहिले पाऊल आहे. चंद्रावर यानाचे पाऊल टाकणे आणि नमुना गोळा करून ते पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याचे असं चक्र असणार आहे”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.


सोमनाथ यांनी रॉकेट, उपग्रह (Satellite) उपक्रमांपासून ते तंत्रज्ञान विकास प्रयत्नांपर्यंतच्या प्रकल्पांच्या विविध पोर्टफोलिओची रुपरेषा मांडली. अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी इस्रोचा (ISRO) बहुआयामी दृष्टीकोन अधोरेखित करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान