Gudi Padwa Shobha Yatra: गुढी पाडव्यानिमित्त महाडमध्ये भव्य शोभायात्रा !

पारंपारिक वेशभूषेत महिला पुरुषांचा सहभाग


महाड : गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी भव्य शोभा यात्रा निघतात. ढोल ताशा पथके तसेच ध्वज पथके आणि पारंपरिक मराठमोळा लुक केलेला असतो. तसेच गुढी पाडव्या निमित्त आज छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती, किल्ले रायगड व समस्त महाडकरांच्या वतीने महाडमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता महाडची ग्रामदेवता श्री जाकमाता देवी च्या मंदिरापासून या शोभा यात्रेला प्रारंभ करण्यात आला. श्री रामाची पालखी व कटेवरी हात ठेवून उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाची भव्य प्रतिकृती सजवलेल्या गाडीवर उभी करण्यात आली होती.


त्यापुढे पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिलांची बाईक रॅली, पुरुष महिलांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले हे सपत्नीक, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, शिवसेनेच्या महाड शहर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई यांसह विविध पक्षांचे महिला व पुरुष पदाधिकारी सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर