Ramayana Movie : रणबीरच्या ‘रामायण’च्या सेटवर मोबाईल बंदी; काय आहे कारण?

Share

दिग्दर्शक नितेश तिवारी ‘या’ कारणामुळे खूप चिंतेत

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आगामी ‘रामायण’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. यात तो रामाची भूमिका साकारणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी ११ कोटी रुपये खर्चून अयोध्येचा सेट बनवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र सिनेमाच्या सेटवरील काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिनेमाच्या टीमकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसताना अनधिकृतपणे हे फोटोज व्हायरल होत आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी सिनेमाच्या टीमने एक नियम तयार केला आहे. यापुढे ‘रामायण’च्या सेटवर सर्व कलाकार व क्रू मेंबर्सना मोबाईल बंदी असणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोज व व्हिडीओजमुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी खूप चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांनी सेटवर ‘नो फोन पॉलिसी’चे पालन करण्यास चित्रपटाच्या टीमला सांगितले आहे. शूटिंग सुरू झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी आणि क्रूने सेटवरून बाहेर पडावे, असा नियमदेखील तिवारी यांनी चित्रपटाच्या टीमसाठी बनवला आहे. फक्त आवश्यक कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर थांबू शकणार आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सेटवरील एका फोटोमध्ये अरुण गोविल हे दशरथ राजाच्या भूमिकेत दिसले. तर अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसली. अभिनेत्री शीबा चड्ढा यादेखील दिसल्या होत्‍या. यानंतर आता दिग्दर्शकांनी ठोस पावले उचलत चित्रपटाच्या टीमसाठी नियम जाहीर केले आहेत.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

6 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

7 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

8 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 hours ago