Devendra Fadnavis : राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील!

  69

मनसेच्या पाडवा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास


नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट घेतली. भाजपच्या नेत्यांचीही राज ठाकरेंबाबत स्वागतार्ह भूमिका आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले. मात्र, राज ठाकरे यांनी अद्याप या युतीबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. उद्या त्यांनी सर्व मनसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं असून यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरेंबाबत भाष्य केलं आहे.


नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे युतीच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये मोदींजींना समर्थन दिलं होतं. मोदीजी पंतप्रधान व्हावे, अशी राज ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात जो विकास केला आहे त्यामुळे नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. मला अपेक्षा आहे की, राज ठाकरे यावेळी मोदींना पाठिंबा देतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत