Devendra Fadnavis : राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील!

  64

मनसेच्या पाडवा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास


नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट घेतली. भाजपच्या नेत्यांचीही राज ठाकरेंबाबत स्वागतार्ह भूमिका आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले. मात्र, राज ठाकरे यांनी अद्याप या युतीबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. उद्या त्यांनी सर्व मनसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं असून यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरेंबाबत भाष्य केलं आहे.


नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे युतीच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये मोदींजींना समर्थन दिलं होतं. मोदीजी पंतप्रधान व्हावे, अशी राज ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात जो विकास केला आहे त्यामुळे नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. मला अपेक्षा आहे की, राज ठाकरे यावेळी मोदींना पाठिंबा देतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित