मुरुड खोरा बंदरात पर्यटक फेरी बोट सेवा बंद

आठवडाभर पर्यटकांचे हाल; तर स्टॉल धारकांचेही आर्थिक नुकसान


मुरुड : मुरुड खोरा बंदरात अचानक फेरी बोट सेवा बंद झाल्याने जंजिरा किल्ला पाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे आठवडाभर प्रचंड हाल झाले आहेत. या ठिकाणी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या स्टॉल धारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. फेरी बोट व्यावसायिक व बंदर अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ होत नसल्याने ही फेरी बोट सेवा बंदर अधिकाऱ्यांनी बंद केल्याचे समजते.


जगप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. राजपुरी येथे फेरी बोट सेवेवर प्रचंड प्रमाणात ताण पडत असल्याने एकदरा खोरा बंदरात फेरी बोट सेवा सुरु करण्यात आली आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या सेवेसाठी जेटीचा विस्तार करण्यात येत आहे. खोरा बंदराचा ही विस्तार करण्यात येत आहे.


हे सर्व सुरू असताना या ठिकाणी खोरा बंदर ते जंजिरा किल्ला अशी फेरी बोट सेवा सुरु आहे. या एकदरा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मिळून माऊली कृपा पर्यटक जलवाहतूक सहकारी संस्था स्थापन केली. बंदर खात्याच्या सर्व प्रकारच्या परवानग्या व परवाने मिळवून कर्ज काढून दागदागिने गहाण ठेवून नवीन बोट तयार केली. २ मार्चला या बोटीचे उद्घाटन करण्यात आले. परंतु या बोटीला शेवट नंबर असल्याने एक महिना उलटून गेला तरी देखील फेरी मिळत नसल्याने मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागलत आहे.


नंबर प्रमाणे फेरी बोट सेवा सुरू करावी अशी मागणी माउली कृपा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. परंतु आधीपासून सुरू असलेल्या फेरीबोट मालकांच्या आडमुठे पणामुळे नंबर देत नसल्याने स्थानिकांच्या बोटीला नंबर मिळत नाही. यासंदर्भात बंदर अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले तरीही ते दुर्लक्ष करीत असल्याने या बोटीला फेरी मिळत नाही.


नंबर मिळत नसल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी २२ मार्च रोजी एम. एम. बी. च्या अलिबाग कार्यालयात जाऊन उपसंरक्षक तथा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांना विनंती केली की गेले महिनाभर आम्हाला नंबरच मिळत नाही तरी सर्व नंबर हे राऊंड पद्धतीने करण्यात यावे जेणेकरून सर्वांना नंबर मिळेल. या विनंतीला मान देऊन लेपांडे यांनी त्याच दिवशी एक एप्रिलपासून राऊंड पद्धतीने फेरी बोट सुरू करण्याचे पत्रद्वारे खोरा बंदर अधिकारी यांना कळविण्यात आले होते.


खोरा बंदर अधिकारी राहुल हे फेरी बोट वाल्यांचे म्हणणे ऐकून घेतच नाहीत त्यामुळे त्यांनी सर्वच बोटी बंद केल्या आहेत. एक एप्रिल पासून फेरी बोट सेवा बंद असल्याने फेरीबोट वाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे व या बंदरात पर्यटन व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.


या ठिकाणी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना परतावे लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तरी बंदर अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व या ठिकाणी असलेल्या फेरीबोटींना नंबर प्रमाणे फेरी द्यावी व सध्या पर्यटक प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी असलेल्या आठ बोटींना एका दिवसात फेरी होत नाही. जर पहिल्या दिवशी तीन किंवा चार बोटीने फेरी मिळाली तर उर्वरित चार बोटींना दुसऱ्या दिवशी फेरी द्यावी व पुन्हा तिसऱ्या दिवशी पहिल्या बोटीने फेरी द्यावी अशा प्रकारे निर्णय घेतला तरच या फेरीबोट वाल्यांचे प्रश्न मार्गी लागतील व आर्थिक नुकसान होणार नाही.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक