Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीत मोठे बदल

३ दिवस 'या' वेळेत अवजड वाहनांना 'नो एन्ट्री'


पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) सलग सुट्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी आजपासून (७ एप्रिल) ते ९ एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना सकाळी सहा ते दुपारी १२ या वेळेत वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने द्रुतगती मार्गावर कडेला थांबविण्यात येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनचालक मालकांनी पुढील तीन दिवस सकाळी ६ ते दुपारी १२ या दरम्यान वाहने रस्त्यावर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.


उन्हाळी सुट्टीमुळे अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतात. लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा ताण वाढतो. मोठ्या संख्येने वाहने द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतुकीचा वेग कमी होतो. त्यामुळे घाट क्षेत्रात वाहतूक कोंडी होते. घाटात वाहने बंद पडल्याने वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागतो. त्यामुळे वाहतूक नियमन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.


वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला थांबविण्यात येणार आहेत. मोटारीसह हलक्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मोटारींच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई मार्गिकेवरील वाहतूक खंडाळा बोगदा परिसरात थांबवून पुणे मार्गिकेवरील वाहतूक विरुद्ध दिशेने वळविण्यात येणार असून, वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे जड-अवजड वाहने बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलिस क्रेनच्या मदतीने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये