कोथेरी येथे घराला आग; लाखोंचे नुकसान

  52

महाड( प्रतिनिधी) - महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणाऱ्या दगडू शिंदे यांच्या घराला आज सकाळी १० वाजण्याचे सुमारास अचानक आग लागल्याने घरातील रोकड, सामानसुमान कपडे असे सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा केल्याने महाड नगर परिषदेचा अग्नीशामक दल येण्यापुर्वी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.


महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणारे दगडू शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे आहेत त्यांचा मुलगा व मुलगी महाड शहरात सकाळी आपल्या कामावर निघून गेले तर त्यांची आई ही रानात गेली होती. सकाळी १० वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना अचानक आग लागली. शिंदे यांचे घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येई पर्यत घरातील कपाटे, फर्निचर, भाताचे भरून ठेवलेले ड्रम यांनी पेट घेतला होता.


स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात यश मिळवले. मात्र घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड आणि फर्निचर सामानसुमान कपडे असे एकुण अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण