कोथेरी येथे घराला आग; लाखोंचे नुकसान

महाड( प्रतिनिधी) - महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणाऱ्या दगडू शिंदे यांच्या घराला आज सकाळी १० वाजण्याचे सुमारास अचानक आग लागल्याने घरातील रोकड, सामानसुमान कपडे असे सुमारे ५ लाखाचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा केल्याने महाड नगर परिषदेचा अग्नीशामक दल येण्यापुर्वी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.


महाड तालुक्यातील कोथेरी वडाचा कोंड येथे राहणारे दगडू शिंदे हे कामानिमित्त मुंबई येथे आहेत त्यांचा मुलगा व मुलगी महाड शहरात सकाळी आपल्या कामावर निघून गेले तर त्यांची आई ही रानात गेली होती. सकाळी १० वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना अचानक आग लागली. शिंदे यांचे घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येई पर्यत घरातील कपाटे, फर्निचर, भाताचे भरून ठेवलेले ड्रम यांनी पेट घेतला होता.


स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने ही आग विझवण्यात यश मिळवले. मात्र घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड आणि फर्निचर सामानसुमान कपडे असे एकुण अंदाजे ५ लाखाचे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी