Shrikant Shinde : कल्याण लोकसभा लढू म्हणणारे गेले कुठे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर बोचरी टीका


कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याणच्या (Kalyan) जागेवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारीची घोषणा केली. कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा फोडला. यावेळेस त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.


श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली.


विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका राहिलेल्या वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे