Shrikant Shinde : कल्याण लोकसभा लढू म्हणणारे गेले कुठे?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची ठाकरे गटावर बोचरी टीका


कल्याण : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याणच्या (Kalyan) जागेवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उमेदवारीची घोषणा केली. कल्याणच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं फडणवीस म्हणाले. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये हेरंबा मंदिर परिसरात प्रचाराचा फोडला. यावेळेस त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली.


श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला. कार्यकर्त्याला पुढे करून "तुम लढो हम कपडा सांभालते है" अशा प्रकारची भूमिका घेतल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली.


विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या दोनवेळा नगरसेविका राहिलेल्या वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार