संजय निरूपम यांच्यावर काँग्रेसची कारवाई, पक्षातून हकालपट्टी

मुंबई: काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काँग्रेसने पक्षातून त्यांची हकालपट्टी केली आहे. पुढील ६ वर्षांसाठी त्यांच्यावर ही कारवाई करम्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संजय निरूपम हे पक्षाविरोधात विधाने करत होते. काँग्रेसकडून ही कारवाई करण्याआधी महाराष्ट्र काँग्रेसने एक प्रस्ताव सादर केला होता. त्यात संजय यांना पक्षातून बाहेर काढण्याबाबत नमूद होते. इतकंच नव्हे तर त्यांना स्टार कँपेनर्सच्या यादीतूनही बाहेरचा रस्ता दाखवला होता.


महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की संजय निरूपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवले आहे. बुधवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संजयला पक्षातून बाहेर काढण्याचा प्रस्ताव संमत झाला होता.


संजय निरूपम यांना काँग्रेसचा उमेदवार म्हणून मुंबई उत्तर पश्चिम येथून निवडणूक लढवायची होती. मात्र शिवसेनेच्या उबाठा गटाने येथून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली. यामुळे संजय निरूपम भ़कले. निरूपम यांनी याआधीही जागावाटपावरून शिवसेनेच्या उबाठा गटावर टीका केली होती.


काँग्रेसकडून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरूपम म्हणाले की काँग्रेसने माझ्यासाठी एनर्जी आणि स्टेशनरी संपवू नये, याउलट त्यांनी उरलेल्या जागा आणि स्टेशनरीचा वापर पक्ष वाचवण्यासाठी करावा. तसेही पक्ष सध्या आर्थिक संकटातून जात आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्र सरकारकडून विमान इंधनावरील 'व्हॅट'मध्ये ११ टक्क्यांची कपात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; 'एटीएफ'वरील व्हॅट १८ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांवर मुंबई : पश्चिम

Ravi Shastri : 'हाच होणार भारताच्या T20 संघाचा कर्णधार'

मुंबई : भारताच्या टी २० संघाचा कर्णधार कोण होणार यावरून क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे. सूर्यकुमार यादवचा

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या