Mobile Phone: मोबाईल उशीच्या खाली ठेवून झोपता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: संशोधनातून समोर आले आहे की दिवसांतून दोन ते तीन तास फोन वापरल्यास कोणतीही समस्या होणार नाही. मात्र त्यापेक्षा अधिक स्क्रीन टाईम वापरल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल फोन दूर ठेवला पाहिजे.

आजकाल प्रत्येक वेळेस मोबाईल आपल्यासोबत असतो. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत दिवसभर ते डोळे फोनमध्येच व्यस्त असतात. मात्र याचा आरोग्यावर खराब परिणाम होत आहे. मोबाईलचे रेडिएशन आपल्या मेंदूवर परिणाम करतात. यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. इतकंच की ब्रेन कॅन्सरही होऊ शकतो.

आरोग्य तज्ञांच्या मते यापासून बचावासाठी स्मार्टफोनचा वापर कमी करावा लागेल. तर रात्री झोपताना डोक्याच्या जवळ अथवा उशीच्या खाली मोबाईल ठेवून झोपू नये.

WHOनुसार स्मार्टफोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन ब्रेन कॅन्सर म्हणजेच ग्लिओमाचा धोका वाढवत आहेत. मोबाईल फोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन मेंदूचा रिअॅक्शन टाईम, स्लीप पॅटर्न आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर चुकीचा परिणाम करतात.

तसेच मोबाईल फोन सातत्याने पँटच्या खिशात ठेवल्याने इन्फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेलाही नुकसान होते. जर दिवसातून दोन ते तीन तास फोन वापरला तर अनेक समस्यांपासून वाचता येते. अधिकचा स्क्रीन टाईम गंभीर आजार निर्माण करू शकतात.

झोपताना फोन दूर ठेवला पाहिजे. तसेच झोपण्याच्या कमीत कमी एक तास आधी फोनचा वापर केला नाही पाहिजे.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे