Mobile Phone: मोबाईल उशीच्या खाली ठेवून झोपता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: संशोधनातून समोर आले आहे की दिवसांतून दोन ते तीन तास फोन वापरल्यास कोणतीही समस्या होणार नाही. मात्र त्यापेक्षा अधिक स्क्रीन टाईम वापरल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. रात्री झोपण्याच्या वेळेस मोबाईल फोन दूर ठेवला पाहिजे.

आजकाल प्रत्येक वेळेस मोबाईल आपल्यासोबत असतो. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत दिवसभर ते डोळे फोनमध्येच व्यस्त असतात. मात्र याचा आरोग्यावर खराब परिणाम होत आहे. मोबाईलचे रेडिएशन आपल्या मेंदूवर परिणाम करतात. यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढतो. इतकंच की ब्रेन कॅन्सरही होऊ शकतो.

आरोग्य तज्ञांच्या मते यापासून बचावासाठी स्मार्टफोनचा वापर कमी करावा लागेल. तर रात्री झोपताना डोक्याच्या जवळ अथवा उशीच्या खाली मोबाईल ठेवून झोपू नये.

WHOनुसार स्मार्टफोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन ब्रेन कॅन्सर म्हणजेच ग्लिओमाचा धोका वाढवत आहेत. मोबाईल फोनमधून निघणारे आरएफ रेडिएशन मेंदूचा रिअॅक्शन टाईम, स्लीप पॅटर्न आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर चुकीचा परिणाम करतात.

तसेच मोबाईल फोन सातत्याने पँटच्या खिशात ठेवल्याने इन्फर्टिलिटी म्हणजेच प्रजनन क्षमतेलाही नुकसान होते. जर दिवसातून दोन ते तीन तास फोन वापरला तर अनेक समस्यांपासून वाचता येते. अधिकचा स्क्रीन टाईम गंभीर आजार निर्माण करू शकतात.

झोपताना फोन दूर ठेवला पाहिजे. तसेच झोपण्याच्या कमीत कमी एक तास आधी फोनचा वापर केला नाही पाहिजे.
Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे