Lok Sabha Elections 2024: काँग्रेसकडून लोकसभेची १०वी यादी, अकोल्यातून यांना दिले तिकीट

  202

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी(loksabha election 2024) काँग्रेसने उमेदवारांची आणखी एक यादी सोमवारी रात्री जाहीर केली. पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या १०व्या यादीत दोन नावे आहेत यातील एक महाराष्ट्रातून तर दुसरे नाव दक्षिण भारतातील तेलंगणा येथून आहे.


पक्षाने आतापर्यंत २१४ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. काँग्रेसने याआधी नऊ वेगवेगळ्या यादींमधून २१२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. सोमवारी रात्री त्यांनी अकोला आणि तेलंगणाच्या वारंगल येथून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.


अकोला येथून काँग्रेसकडून अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर तेलंगणामधील वारंगल येथून कादियाम काव्य यांना उमेदवारी दिली आहे.



अकोल्यात प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभय पाटील


दरम्या, अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अकोलाच्या जागेवर भाजपने विजय मिळवला होते. भाजपचे संजय शामराव धोत्रे येथून खासदार म्हणून निवडून आले होते. ते सलग पाचवेळा लोकसभा निवडणूक जिंकले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत