चीनने अरूणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, परराष्ट्र मंत्री म्हणाले- काहीही फरक पडणार नाही

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेशवर आपला दावा ठोकण्याच्या आणखी एका प्रयत्नात चीनने भारतातील पूर्वोत्तर राज्यामध्ये एलएसीसोबत विविध ठिकाणच्या ३० नव्या स्थानांची चौथी यादी जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे फेटाळून लावत म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. हे पहिल्यांदाच घडलेले नाही की चीनने भारतीय क्षेत्रातील ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला.


चीनच्या नागरी मंत्रालयाचे हे कृत्य अरूणाचल प्रदेशातील स्थानांवर दावा ठोकण्याचा नवीन प्रयत्न आहे. चीनने अरूणाचल प्रदेशमधील काही ठिाकणांची भौगोलिक नावांची यादी जाहीर केली. चीनने ज्या ३० ठिकाणांची नावे बदलली त्यात १२ डोंगर, चार नद्या, एक तलाव, एक डोंगराळ भाग, ११ राहण्याची ठिकाणे आणि जमीनीच्या तुकड्याचा समावेश आहे. चीनने या नावांना चीनच्या अक्षरांमध्ये लिहिले आहे.


२०१७मध्ये बीजिंगने अरूणाचल प्रदेशातील सहा जागांसाठी स्टँडर्डाईज्सत नावांची प्रथम यादी जाहीर केली होती. यानंतर २०२१मध्ये १५ स्थानांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर २०२३मध्ये ११ अतिरिक्त स्थानांची एक यादी जाहीर करण्यात आली होती


यातच भारताने मात्र चीनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. भारताने म्हटले आहे की अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील. येथील ठिकाणांना आपली नावे दिल्याने तो भाग आपला होत नाही. याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरूणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि नेहमीच राहील. नाव बदलण्याने कोणताही परिणाम होत नाही. आमचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू