चीनने अरूणाचलमधील ३० ठिकाणांची नावे बदलली, परराष्ट्र मंत्री म्हणाले- काहीही फरक पडणार नाही

नवी दिल्ली: अरूणाचल प्रदेशवर आपला दावा ठोकण्याच्या आणखी एका प्रयत्नात चीनने भारतातील पूर्वोत्तर राज्यामध्ये एलएसीसोबत विविध ठिकाणच्या ३० नव्या स्थानांची चौथी यादी जाहीर केली. परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे दावे फेटाळून लावत म्हटले की अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमीच राहील. हे पहिल्यांदाच घडलेले नाही की चीनने भारतीय क्षेत्रातील ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला.


चीनच्या नागरी मंत्रालयाचे हे कृत्य अरूणाचल प्रदेशातील स्थानांवर दावा ठोकण्याचा नवीन प्रयत्न आहे. चीनने अरूणाचल प्रदेशमधील काही ठिाकणांची भौगोलिक नावांची यादी जाहीर केली. चीनने ज्या ३० ठिकाणांची नावे बदलली त्यात १२ डोंगर, चार नद्या, एक तलाव, एक डोंगराळ भाग, ११ राहण्याची ठिकाणे आणि जमीनीच्या तुकड्याचा समावेश आहे. चीनने या नावांना चीनच्या अक्षरांमध्ये लिहिले आहे.


२०१७मध्ये बीजिंगने अरूणाचल प्रदेशातील सहा जागांसाठी स्टँडर्डाईज्सत नावांची प्रथम यादी जाहीर केली होती. यानंतर २०२१मध्ये १५ स्थानांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर २०२३मध्ये ११ अतिरिक्त स्थानांची एक यादी जाहीर करण्यात आली होती


यातच भारताने मात्र चीनचे हे दावे फेटाळून लावले आहेत. भारताने म्हटले आहे की अरूणाचल प्रदेश हे राज्य भारताचा अविभाज्य भाग होता आणि नेहमीच राहील. येथील ठिकाणांना आपली नावे दिल्याने तो भाग आपला होत नाही. याबाबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, जर मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरूणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि नेहमीच राहील. नाव बदलण्याने कोणताही परिणाम होत नाही. आमचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात आहे.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत