Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्र ते अयोध्या केवळ साडेपाच तासांचा प्रवास

भाविकांसाठी 'ही' खास सुविधा


अयोध्या : अनेक वर्षांपासून अयोध्या राम जन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. २०२४ साली अयोध्येत रामलल्ला मूळ गर्भगृहामध्ये विराजमान झाले, त्यामुळे अयोध्या नगरीचं वेगळं रुप सर्वांसमोर आल आहे. देशभरातून अनेकांचे पाय या तीर्थक्षेत्राकडे वळले आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनीसुद्धा ही अयोध्यानगरी पाहण्यासाठीची उत्सुकता दाखवली.


देशातील रेल्वे विभागानंही विविध राज्यांतून अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून दिले आणि विमानसेवा पुरवणाऱ्या संस्थाही यात मागे राहिल्या नाहीत. याच अयोध्येत पोहोचण्यासाठीचा महाराष्ट्रातून सुरु होणारा प्रवासही आता अधिक सुलभ आणि सुकर झाला आहे. पर्यटक आणि भाविकांचा रामलल्ला अयोध्यानगरी साठीचा २१ तासांचा हा प्रवास आता केवळ साडेपाच तासांत पूर्ण करता येणार आहे.



असा करता येणार प्रवास


इंडिगोने (Indigo) अयोध्यानगरी प्रवासासाठी ७२ आसनक्षमता असणारं विमान सुरू केलं आहे. राज्यातील नाशिक विमानतळाहून सोमवारपासून थेट लखनऊ फ्लाइट सुरू झाल्याने आता नाशिककरांना आणि पर्यायी महाराष्ट्रातील नागरिकांना अवघ्या साडेपाच तासांत अयोध्येला पोहचता येणार आहे. नाशिक-नागपूर फ्लाइटचा सेवा विस्तार लखनऊ पर्यंत केल्यामुळे नागपूरमध्ये जाऊन विमान बदलण्याची गरज भासणार नाही.


नाशिक विमानतळावरून दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी नागपूरकरता विमान उड्डाण करेल. जे नागपूर विमानतळावर सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तेथून हे विमान लखनऊला रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष म्हणजे रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करण्यासाठी किमान दोन हजार रुपये मोजावे लागतात, तर विमानसेवेसाठी जवळपास ३७०० ते ४२०० रुपये सध्या मोजावे लागत आहेत, त्यामुळे अनेकांना ही तिकीटं खर्चाच्या बाबतीतही महाग वाटत नाहीयेत.


या मार्गावर सोमवारी पहिल्याच विमानाचं उड्डाण झालं असून, प्रवाशांनी या सेवेला कमाल प्रतिसाद दिला. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हजारो नाशिककर अयोध्येला जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे हे नक्की.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील