IPL 2024 : पुन्हा आयपीएलच्या वेळापत्रकात होणार बदल!

मुंबई : भारतात लोकसभा निवडणूक (loksabha election) तसेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) चा थरार सुरु आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामनेही भारतात होणार असून दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून या वेळापत्रकात बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील १७ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याच्या शेड्यूलमध्ये बदल होऊ शकतो. रामनवमीमुळे केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा वार्षिक उत्सव देशभरातील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यामुळे या दिवशी सामन्याला पुरेशी सुरक्षा देण्याबाबत प्रशासन गोंधळात आहे. या महिन्यापासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असून या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने सामना पुढे ढकलण्याचा पर्यायही ठेवला आहे.


बीसीसीआय आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) कोलकाता पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु बीसीसीआयने संभाव्य बदलांबाबत फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर या दोघांनाही संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल यूएईमध्ये होऊ शकते, असे मानले जात होते, परंतु बीसीसीआयने हे सर्व अंदाज फेटाळून लावले होते. मात्र, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यात केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना पुन्हा नियोजित करावा लागेल. पोलिस प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असे आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी