वाहनचालकांसाठी खुशखबर! टोलबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली: देशातील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने सांगितले की सध्या देशात टोलच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले की निवडणुकीपर्यंत टोलचे जुनेच दर लागू असतील.


याआधी बातमी आली होती की देशात १ एप्रिलपासून अनेक ठिकाणी टोलचे नवे दर लागू होतील. लखनऊ आणि आजूबाजूला तर टोल दरात ५ टक्के वाढीची घोषणाही झाली होती.


भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सांगितले होते की त्यांनी हायवेवरील नवे टोल दर हो लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत. साधारणपणे देशातील अधिकतर टोलच्या दरात १ एप्रिलला वाढ केली जाते मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की नवे दर लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत.


निवडणूक आयोगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दिल्या गेलेल्या आदेशात म्हटले की सध्यातरी दरवाढीचा हा निर्णय टाळण्यात यावा. देशभरातील हायवे आणि एक्सप्रेवेवर तब्बल ५ टक्के टोलशुल्क एक एप्रिलपासून वाढणार होते.


देशात १८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जूनला मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये यावेळेस ८५५ टोल प्लाझा आहेत.

Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा