वाहनचालकांसाठी खुशखबर! टोलबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली: देशातील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने सांगितले की सध्या देशात टोलच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले की निवडणुकीपर्यंत टोलचे जुनेच दर लागू असतील.


याआधी बातमी आली होती की देशात १ एप्रिलपासून अनेक ठिकाणी टोलचे नवे दर लागू होतील. लखनऊ आणि आजूबाजूला तर टोल दरात ५ टक्के वाढीची घोषणाही झाली होती.


भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सांगितले होते की त्यांनी हायवेवरील नवे टोल दर हो लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत. साधारणपणे देशातील अधिकतर टोलच्या दरात १ एप्रिलला वाढ केली जाते मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की नवे दर लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत.


निवडणूक आयोगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दिल्या गेलेल्या आदेशात म्हटले की सध्यातरी दरवाढीचा हा निर्णय टाळण्यात यावा. देशभरातील हायवे आणि एक्सप्रेवेवर तब्बल ५ टक्के टोलशुल्क एक एप्रिलपासून वाढणार होते.


देशात १८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जूनला मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये यावेळेस ८५५ टोल प्लाझा आहेत.

Comments
Add Comment

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट