वाहनचालकांसाठी खुशखबर! टोलबाबत आली मोठी बातमी

नवी दिल्ली: देशातील वाहनचालकांसाठी मोठी बातमी आली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने सांगितले की सध्या देशात टोलच्या दरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रालयाने यासाठी निवडणूक आयोगाचा हवाला देत सांगितले की निवडणुकीपर्यंत टोलचे जुनेच दर लागू असतील.


याआधी बातमी आली होती की देशात १ एप्रिलपासून अनेक ठिकाणी टोलचे नवे दर लागू होतील. लखनऊ आणि आजूबाजूला तर टोल दरात ५ टक्के वाढीची घोषणाही झाली होती.


भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला सांगितले होते की त्यांनी हायवेवरील नवे टोल दर हो लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत. साधारणपणे देशातील अधिकतर टोलच्या दरात १ एप्रिलला वाढ केली जाते मात्र निवडणूक आयोगाने सांगितले की नवे दर लोकसभा निवडणुकीनंतर लागू करावेत.


निवडणूक आयोगाने नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाला दिल्या गेलेल्या आदेशात म्हटले की सध्यातरी दरवाढीचा हा निर्णय टाळण्यात यावा. देशभरातील हायवे आणि एक्सप्रेवेवर तब्बल ५ टक्के टोलशुल्क एक एप्रिलपासून वाढणार होते.


देशात १८व्या लोकसभेसाठी १९ एप्रिलपासून मतदान सुरू होत आहे. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जूनला मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जूनला होणार आहे. नॅशनल हायवे नेटवर्कमध्ये यावेळेस ८५५ टोल प्लाझा आहेत.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे