Heat Stroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी!

बिडकीन : मराठवाड्यात उष्माघाताने (Heat Stroke) पहिला बळी घेतला आहे. मृत मुलगा ३० वर्षीय आहे. जैनपूर मध्ये फिरायला गेला असताना त्याला अचानक चक्कर आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


गणेश कुलकर्णी हा ३० वर्षीय मुलगा मित्र आणि नातेवाईकांसोबत संध्याकाळी चारच्या सुमारास फिरायला गेला होता. यावेळी तो अचानक चक्कर येऊन पडला. त्याच्या नाका-तोंडून फेस येऊन तो जागीच मृत पावला. तातडीने त्याला बिडकीन मध्ये ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. गणेशच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपावण्यात आला होता. काल रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


गणेश हा एका खाजगी कंपनीत मजूर म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि १४ महिन्याचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर आजूबाजुच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.


होळी होताच राज्यात उन्हाचा पारा तीव्र झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्य आग ओकत असल्याने दुपारी उन्हात बाहेर पडणे अनेकांना कठीण झाले आहे.


गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी दिली आहे.


सध्या उन्हाचा वाढता कडाका पाहता दुपारच्या वेळेस अत्यावश्यक नसल्यास उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ