तुम्हाला वांग्याची भाजी आवडते का? तर हे जरूर वाचा

  173

मुंबई: वांगी... बाजारात आढळणारी सामान्य भाजी. या भाजीमुळे मेंदूची शक्ती वाढते. तसेच वांग्यामुळे शुगर आणि वजन कमी करण्यातही मदत मिळते.


वांगी ही अशी भाजी आहे जी फार कमी लोक खाणे पसंत करतात. मात्र वांग्यामध्ये आरोग्यासाठी लाभदायक असे गुण आहेत. आरोग्यासोबतच वांगे हे मेंदूच्या आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक आहे. वांग्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही नेहमीच वांगे खाणे पसंत कराल.


मेमरीसाठी वांगे अतिशय लाभदायक आहे. यामुळे मेंदू तल्लख होतो. तज्ञांच्या मते वांग्यामध्ये आढळणार एंथोसायनिन आणि नासुनिन हे एन्झाईम मेंदूच्या पेशींना मदत करतात. सोबतच मेंदूच्या पेशींना डिटॉक्स करण्यासोबत वांग्याच्या मदतीने मेंदूमध्ये रक्तपुरवठा व्यवस्थित होते. यामुळे मेमरी पॉवर वाढते आणि मेंदूचे आजार दूर होतात. वांग्यामध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट एन्झाईम मेंदू मजबूत करण्यास मदत करतो. तसेच मेंदूची कार्यक्षमताही वाढवतो.


वांगे हे मेंदूच्या विकासासोबत हाडांच्या विकासासाठीही फायदेशीर आहे. वांग्यामध्ये आढळणारे फेनोलिक नावाचे एन्झाईम हाडांची घनता वाढवते आणि यामुळे हाडे मजबूत होतात. वांग्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.


वांग्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यातील बायोफ्लॅवेनॉईड्स रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका कमी होतो. यातील क्लोरोजेनिक एन्झाईम खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी राहते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक