नागरिकांनो, काळजी घ्या! उन्हाचा पारा वाढणार, IMDने दिली माहिती

  81

मुंबई: भारतीय हवामान विभागाने उन्हाळ्याबाबत आपले अंदाज व्यक्त केले आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या उन्हाळ्यात उन्हाचा पारा खूप वाढणार असून उष्णतेच्या लाटा अधिक असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते एप्रिल ते जूनपर्यंत देशातील अधिकतर भागात तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.


दरम्यान, पूर्व, उत्तरपूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील काही भागात सामन्यपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता आहे. तर उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिमच्या काही भागांना सोडल्यास देशातील अधिकांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाने दिली माहिती


एप्रिल महिन्याबाबत जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार भारताच्या अधिकांश भागात सामान्यपेक्षा अधिक तापमान राहील. तर पूर्व, उत्तर-पूर्व आणि उत्तर पश्चिम भारतातील एक अथवा दोन भाग सोडले तर किमान तापमान सामन्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.


उन्हाच्या वाढत्या पारासोबत देशभरात उष्णतेच्या लाटांमध्येही वाढ होऊ शकते. हवामान विभागाचे म्हणणे आहे की दक्षिण प्रायद्वीच्या अधिकांश भाग मध्य भारत, उत्त पश्चिमच्या मैदानी भागात सामान्यपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात अधिक उष्णता असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.