एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली

उन्हाचा दाह कमी करणारे रसाळ खरबूज लै भारी !


नवी मुंबई : अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हात गारेगारची अनुभूती देणाऱ्या फळांकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांनी आपला मोर्चा वळवला आहे. एपीएममी मार्केटमध्येही उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. रमजानचे दिवस सुरू असल्याने फळांना मोठी मागणी आहे. उन्हाचा दाह कमी करणाऱ्या फळांपैकी खरबूज हे फळ चविष्ट तर आहेच, त्याचसोबत शरीरासाठीदेखील गुणकारी आहे. वाशीतील एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली असून विविध प्रजाती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सुमारे २ हजार ९५५ किंटल खरबुजांची आवक झाली आहे. युरोपियन कँटालूप म्हणजेच नारंगी, उत्तर अमेरिकन, सारडा, हनीड्यू, पर्शियन, कँडी किस, कॅनिरी आदी प्रकारच्या खरबुजांच्या प्रजाती बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.


घाऊक बाजारात २२ ते २५ रुपये प्रतिकिलो किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भारतात दरवर्षी अंदाजे एक ते दोन दशलक्ष टन खरबुजाचे उत्पादन घेतले जाते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब ही राज्ये खरबुजांच्या उत्पादनात देशात अग्रगण्य आहेत. या भागांमध्ये हार मधू, दुर्गापुरा मधू, पुसा शरबरी, अर्का राजहंस, अर्का जीत, पुसा मधुरस आणि पुसा रसराज या प्रजातींच्या खरबुजांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. भारतात कस्तुरी खरबुजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कस्तुरीचे मूळ हे इराण, अनातोलिया आणि अर्मेनिया येथे आहे.



काय आहेत कस्तुरी खरबूजचे फायदे


कस्तुरी खरबूजमध्ये 'अ' आणि क जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडतो. त्यात सुमारे ९० टक्के पाणी आणि नऊ टक्के कर्बोदके आढळतात. चवीला गोड असल्याने कस्तुरी खरबूजला महाराष्ट्र तसेच देशभरातून मोठी मागणी असते. खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि 'क' जीवनसत्वाचा साठा असल्याने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते. त्याचसोबत अल्सर, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या पोटाशी निगडित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील फायबरयुक्त खरबूज फायदेशीर ठरते.


Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके

मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद