एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली

उन्हाचा दाह कमी करणारे रसाळ खरबूज लै भारी !


नवी मुंबई : अंगाची लाही लाही करणाऱ्या कडक उन्हात गारेगारची अनुभूती देणाऱ्या फळांकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांनी आपला मोर्चा वळवला आहे. एपीएममी मार्केटमध्येही उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. रमजानचे दिवस सुरू असल्याने फळांना मोठी मागणी आहे. उन्हाचा दाह कमी करणाऱ्या फळांपैकी खरबूज हे फळ चविष्ट तर आहेच, त्याचसोबत शरीरासाठीदेखील गुणकारी आहे. वाशीतील एपीएमसीत कलिंगड, पपईसोबतच खरबुजांची आवक वाढली असून विविध प्रजाती ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सुमारे २ हजार ९५५ किंटल खरबुजांची आवक झाली आहे. युरोपियन कँटालूप म्हणजेच नारंगी, उत्तर अमेरिकन, सारडा, हनीड्यू, पर्शियन, कँडी किस, कॅनिरी आदी प्रकारच्या खरबुजांच्या प्रजाती बाजारात खवय्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.


घाऊक बाजारात २२ ते २५ रुपये प्रतिकिलो किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो भारतात दरवर्षी अंदाजे एक ते दोन दशलक्ष टन खरबुजाचे उत्पादन घेतले जाते. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पंजाब ही राज्ये खरबुजांच्या उत्पादनात देशात अग्रगण्य आहेत. या भागांमध्ये हार मधू, दुर्गापुरा मधू, पुसा शरबरी, अर्का राजहंस, अर्का जीत, पुसा मधुरस आणि पुसा रसराज या प्रजातींच्या खरबुजांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. भारतात कस्तुरी खरबुजाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कस्तुरीचे मूळ हे इराण, अनातोलिया आणि अर्मेनिया येथे आहे.



काय आहेत कस्तुरी खरबूजचे फायदे


कस्तुरी खरबूजमध्ये 'अ' आणि क जीवनसत्वांचा मोठ्या प्रमाणात साठा सापडतो. त्यात सुमारे ९० टक्के पाणी आणि नऊ टक्के कर्बोदके आढळतात. चवीला गोड असल्याने कस्तुरी खरबूजला महाराष्ट्र तसेच देशभरातून मोठी मागणी असते. खरबुजामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि 'क' जीवनसत्वाचा साठा असल्याने पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत होते. त्याचसोबत अल्सर, बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या पोटाशी निगडित समस्या दूर ठेवण्यास मदत करते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील फायबरयुक्त खरबूज फायदेशीर ठरते.


Comments
Add Comment

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार.. जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत - भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र

उबाठा सोडून शिवसेना,भाजपात गेलेल्या कुणी मिळवली विजयश्री

उबाठात राहूनही ९ जणांची उमेदवारी नाकारली, ९ जणांचा पराभव मुंबई (सचिन धानजी) : शिवसेनेत जुलै २०२२ रोजी मोठा राजकीय

सीईटी नोंदणीत ‘आधार’चा अडथळा

नावातील विसंगतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या