Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

  73

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद दिलं आहे. मुंबई संघाला पाच वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाला चाहत्यांनी जोरदार विरोध केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्समधील आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका केली गेली.


रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. क्रिकेटचं मैदान असो वा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


परंतु आता हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अशा कोणत्याही गोष्टी एमसीए करणार नाही. या सर्व अफवा पसरवल्या आहेत असे एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट