Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

  67

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद दिलं आहे. मुंबई संघाला पाच वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाला चाहत्यांनी जोरदार विरोध केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्समधील आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका केली गेली.


रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. क्रिकेटचं मैदान असो वा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


परंतु आता हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अशा कोणत्याही गोष्टी एमसीए करणार नाही. या सर्व अफवा पसरवल्या आहेत असे एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार