Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद दिलं आहे. मुंबई संघाला पाच वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाला चाहत्यांनी जोरदार विरोध केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्समधील आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका केली गेली.


रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. क्रिकेटचं मैदान असो वा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


परंतु आता हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अशा कोणत्याही गोष्टी एमसीए करणार नाही. या सर्व अफवा पसरवल्या आहेत असे एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख