Hardik pandya: हार्दिक पांड्याच्या विरोधकांवर एमसीए करणार कारवाई?

मुंबई : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पांड्याला संघाचं कर्णधारपद दिलं आहे. मुंबई संघाला पाच वेळेस चॅम्पियन बनवणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवलं गेल्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी नाराजीचा सूर मारला आहे. निर्णय क्रिकेट चाहत्यांना पटलेला नाही. पहिल्या दिवसापासूनच या निर्णयाला चाहत्यांनी जोरदार विरोध केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये उतरलेल्या मुंबई इंडियन्समधील आतापर्यंतच्या सामन्यांत चाहत्यांकडून टीका केली गेली.


रोहितला कर्णधारपदावरुन काढून हार्दिकला कर्णधारपद देणं हे मुंबईच्या फॅन्सला आवडलेलं नाही. क्रिकेटचं मैदान असो वा सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. मुंबईचे गेले दोन सामने हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये पार पडले. हे दोन्ही सामने होम ग्राऊंडवर नव्हते. तरीही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं गेलं. मुंबईचा पुढील सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यातही हार्दिकला जोरदार ट्रोल केलं जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


परंतु आता हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. एमसीएने सुरक्षा वाढवली आहे. सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच हार्दिकला त्रास देणाऱ्या किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांना ताब्यात घेतले जाईल. अशा लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र, अशा कोणत्याही गोष्टी एमसीए करणार नाही. या सर्व अफवा पसरवल्या आहेत असे एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Comments
Add Comment

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात

Vaibhav Suryawanshi : '७ षटकार, ७ चौकार'! वैभव सूर्यवंशीने महाराष्ट्राच्या गोलंदाजीचे मोडले कंबरडे, केली नाबाद १०८ धावांची वादळी खेळी!

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज

एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट

Ind beat Sa 1st ODI : थरार शेवटच्या षटकापर्यंत! रांची वनडेत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय; विराटचे शतक, कुलदीपचा भेदक मारा

रांची : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला रोमांचक सामना