Cyber Crime: सावधान! +92 या क्रमांकांपासून सुरु होणारे कॉल घेऊ नका, सरकारने का दिला इशारा

मुंबई : सध्याच्या घडीला मोबाईल वापरणं मुलभूत गरज बनली आहे. आजकाल सर्वच काम मोबाईल वर होऊन जातात. मोबाईलच्या फायद्यांसह अनेक दुरुपयोगही होत आहेत. मोबाईल्समुळे सायबर क्राईम अधिक प्रमाणात वाढत असल्याने मोबाईल वापरकर्त्यांना दुरसंचार विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. व्हॉट्सअॅपवर +92 सारख्या परदेशी मूळ क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते कॉल उचलू नका. या नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे, असे दुरसंचार विभागाने म्हटले.


+92 या नंबरवरुन कॉल आला आणि सरकारी अधिकारी असल्याचे सांगत असल्यास तरी देखील कोणतीही माहिती देऊ नका. टेलिकॉम विभागांची तोतयागिरी करणारे कॉलर मोबाईल वापरकर्त्यांना धमकावत आहेत. त्यांचे नंबर डिस्कनेक्ट केले जातील किंवा काही बेकायदेशीर कामांमध्ये त्यांच्या नंबरचा गैरवापर केला जात आहे. असे सांगून हे सायबर गुन्हेगार निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.


दूरसंचार विभाग आपल्या वतीने कोणालाही असे कॉल करण्यासाठी सहमती दिली नाही. त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही गोष्टी शेअर न करण्यास सांगितले. असे कॉल प्राप्त करणाऱ्या लोकांची प्रकरणे वाढत आहेत. सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करण्यासाठी या कॉलद्वारे लोकांना धमकावून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दुरसंचार विभागाने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. असे कॉल आल्यास कुठलीही माहिती देऊ नका. सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचा सल्ला दुरसंचार विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले

Satara Suicide : WhatsApp स्टेटसमुळे वाचले महिला पोलिसाचे प्राण; नेमकं काय घडलं?

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय