Hardik Pandya : दोन पराभवांनंतर मुंबईच्या कर्णधाराने घेतला ब्रेक

कुटुंबासोबत वेळ घालवायला गेला हार्दिक पांड्या, चाहते नाराज


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) चर्चा आहे. मात्र, यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणार्‍या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदा पहिल्या विजयासाठी करावी लागत असलेली धडपड. मुंबईचा कर्णधार म्हणून सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नेतृत्व करत आहे. मात्र, रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिकची निवड झाल्यापासूनच मुंबईचे चाहते प्रचंड नाराज झाले असून हार्दिकला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागला आहे. त्यातच आता दोन पराभव पदरी पडल्यानंतर हार्दिकचं अचानक ब्रेक घेणं ट्रोलिंगचा विषय ठरत आहे. हार्दिक आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवण्यासाठी गेला आहे. मात्र, मुंबईचं भवितव्य धोक्यात असताना हार्दिकचं असं ब्रेक घेणं चाहत्यांच्या जिव्हारी लागलं आहे.


आयपीएल २०२४ सुरु झाल्यापासून एकही सामना मुंबई इंडियन्सला जिंकता आलेला नाही. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध २४ मार्चला गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या लढतीत मुंबईचा ६ धावांनी पराभव झाला होता. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा ३१ धावांनी पराभव झाला होता. यानंतर मुंबईची पुढील मॅच १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. या दरम्यानच्या काळात हार्दिक पांड्या त्याच्या घरी पोहोचला असून त्याने काही वेळ कुटुंबीयांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे.


सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरोधातील मॅच नंतर मुंबईची टीम दिल्लीत परतल्यानंतर हार्दिक पांड्या लगेचच त्याच्या मुंबईतील घरी निघून गेला. हार्दिक पांड्या पुन्हा आराम करुन राजस्थान विरुद्धच्या मॅचसाठी तयार होईल. त्याने टीमसोबत राहण्याऐवजी कुटुंबीयांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने मुंबईचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.



हार्दिकसाठी यंदाचं आयपीएल खास नाही


हार्दिक पांड्याला यंदाचं आयपीएल चांगलं गेलेलं नाही. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. एकीकडे क्रिकेट फॅन्सकडून होणारी टीका आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे दोन जिव्हारी लागणारे पराभव या स्थितीचा सामना हार्दिक पांड्याने केला आहे. याशिवाय गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी देखील अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्या विरोधात नारेबाजी केली होती.


Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा